शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

अंत्ययात्रा रोखून पोलीस अधिकारी बनला देवदूत, त्या 'मृत' युवकाचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 2:15 PM

जिवंत माणसाला मृत समजून दिल्लीतील एक कुटुंब अंत्यसंस्कार करायला निघाले होते. पण पोलीस दलातील एका अधिका-याने समयसूचकता आणि प्रसंगावधान दाखवल्यामुळे युवकाचे प्राण वाचले.

ठळक मुद्देवीस मिनिटांनी राजूचे वडिल त्याच्या रुममध्ये गेले तेव्हा समोरचे दृश्य बघून त्यांना धक्काच बसला.संजय कुमार निपचित पडलेल्या राजूची शरीराची पाहणी करत होते, तितक्यात शववाहिनी घराबाहेर आली. 

नवी दिल्ली - जिवंत माणसाला मृत समजून दिल्लीतील एक कुटुंब अंत्यसंस्कार करायला निघाले होते. पण दिल्ली पोलीस दलातील एका अधिका-याने समयसूचकता आणि प्रसंगावधान दाखवून त्या कुटुंबाला अंत्यसंस्कार करण्यापासून रोखल्यामुळे 21 वर्षीय युवकाचे प्राण वाचले. सोमवारी संध्याकाळी बारा हिंदू राव भागातून दिल्ली पोलिसांना एका युवकाने आत्महत्या केल्याचा फोन आला. एसएचओ संजय कुमार तात्काळ आपल्या पथकासह  घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. 

संजय कुमार यांनी कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि,  संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसलेले असताना राजू (21) आपल्या रुममध्ये निघून गेला. वीस मिनिटांनी राजूचे वडिल त्याच्या रुममध्ये गेले तेव्हा समोरचे दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. राजूने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. त्यांचा हंबरडा ऐकून घरातले सगळे तिथे पोहोचले. राजूने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. घरातल्यांनी त्याच्या गळयाभोवतीचा फास सोडवून त्याला खाली उतरवले. 

खरतर राजू त्यावेळी बेशुद्धावस्थेत होता. पण त्याचा मृत्यू झालाय असा घरच्यांचा समज झाला. त्यांच्यापैकी एकाने पोलिसांना फोन करुन या आत्महत्येची माहिती दिली. संजय कुमार तिथे पोहोचल्यानंतर त्यानी खोलीची पाहणी केली. त्यावेळी उंची कमी असल्यामुळे गळफास घेऊन मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाने राजूच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. संजय कुमार निपचित पडलेल्या राजूची शरीराची पाहणी करत होते. तितक्यात शववाहिनी घराबाहेर आली. 

संजय कुमार राजूला तपासत असताना त्याच्या नाडीचे ठोके चालू असल्याचे त्यांना जाणवले. या ठोक्यांचा वेग खूप मंद होता. त्यांनी तात्काळ राजूला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांनी गाडीमध्ये राजूला सीपीआर उपचार मिळतील याची व्यवस्था केली. रुग्णालयात डॉक्टरांनी योग्य ते उपचार करुन राजूला शुद्धीत आणले. राजूला रुग्णालयात आणायला आणखी थोडा उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. शुध्दीत आल्यानंतर राजूने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आई-वडिलांकडून सतत ओरडा पडत असल्याने आपण आत्महत्येचा पाऊल उचलले असे त्याने पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्या