शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचा ‘हनी ट्रॅप’; महिला पोलिसाने दाखविले लग्नाचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:17 IST

पोलीस ब-याच काळापासून बालकिशन चौबे नावाच्या गुन्हेगाराच्या शोधात होते.

भोपाळ : एखाद्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलीस काय युक्ती योजतील, हे सांगता येत नाही. खुनासह १६ गुन्ह्यांतील संशयित इसमाला अटक करण्यासाठी पोलिसांनी अटक करण्यासाठी गमतीदार सापळा रचला. तो संशयित विवाह करण्याच्या विचारात असल्याचे कळताच एका महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला.पोलीस ब-याच काळापासून बालकिशन चौबे नावाच्या गुन्हेगाराच्या शोधात होते. त्याची माहिती देणा-यास १० हजार रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले होते; पण तो हाती लागत नव्हता. त्याची माहिती मिळवताना पोलिसांना कळले की, बालकिशन चौबे विवाहाच्या तयारीत आहे आणि योग्य मुलीच्या शोधात आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांकही मिळविला.मोबाईल क्रमांक मिळवल्यानंतर आता महिला अधिकाºयामार्फत त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवावा, असे ठरविण्यात आले. त्यासाठी पोलिसांनी मूळच्या बुंदेलखंडच्या व दिल्लीत मजुरी करणाºया एका महिलेचे सीम कार्ड काही काळासाठी ताब्यात घेतले. त्या क्रमांकावरून महिला पोलीस अधिकाºयाने त्याला कॉल केला. प्रत्यक्षात मात्र तुमचा क्रमांक चुकून लागला, असे तिने त्याला सांगितले.त्यामुळे बालकिशन चौबे याने तुम्ही कोण आहात, कुठे राहता, काय करता, अशी चौकशी फोनवरून सुरू केली. त्यानंतर तो महिला पोलीस अधिकाºयास वारंवार कॉल करू लागला. एक आठवडा असेच संभाषण सुरू राहिले.आठवड्यानंतर महिला पोलीस अधिका-याने तू माझ्याशी विवाह करणार का, करणार असशील तरच आपण बोलू, असे सांगितले. त्याने त्यास होकार दिला. (वृत्तसंस्था)साखरपुड्याला पोहोचला आणि...महोबा जिल्ह्यातील बिजौरी गावात आपण गुरुवारी साखरपुडा करायचा, असे त्या दोघांमध्ये ठरले. त्या गावातील मंदिरातच साखरपुडा करण्याचा निर्णय झाला. महिला पोलीस अधिकारीही साखरपुड्यासाठी सजून तिथे पोहोचली. अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारीही तिथे तिचे नातेवाईक म्हणून आले होते. बालकिशन चौबे त्या मंदिरात पोहोचताच पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. छतरपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस. एस. बघेल यांनीच ही माहिती दिली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश