शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भाजपाच्या कार्यालयासमोर महिलेने केलेल्या आत्मदहनाप्रकरणी पोलिसांनी माजी राज्यपालांच्या मुलास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 16:26 IST

Lucknow News : भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काल एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देलखनौमधील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर काल एका महिलेने स्वत:वर ज्वलाग्राही पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होतेलखनौ पोलिसांनी माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचे पुत्र आलोक यांना ताब्यात घेतले महाराजगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लखनौ पोलिसांना आलोक यांना ताब्यात घेतले

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काल एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी लखनौ पोलिसांनी माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचे पुत्र आलोक यांना ताब्यात घेतले आहे. आलोक हे काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घटनेमागे काही कटकारस्थान असल्याचा पोलिसांचा दावा आहे.महाराजगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लखनौ पोलिसांना आलोक यांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर आलोक यांचे लोकेशन मिळाले होते. तसेच आलोक हे या महिलेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमधील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर काल एका महिलेने स्वत:वर ज्वलाग्राही पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी आग आटोक्यात आणत गंभीरपणे भाजलेल्या महिलेला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या महिलेची प्रकृती गंभीर आहे.मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला अंजना तिवारी ही उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील राहणारी आहे. तिचा विवाह अखिलेश तिवारी याच्याशी झाला होता. मात्र विवाहाच्या काही दिवसांनंतरच या दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर या महिलेने धर्मपरिवर्तन करत आसिफ नावाच्या तरुणाशी विवाह केला होता. विवाहानंतर आसिफ रझा हा सौदी अरेबियाला निघून गेला. दरम्यान, आसिफचे कुटुंबीय आपल्याला सातत्याने त्रास देत असल्याचा जबाब या महिलेने दिले आहे. तसेच या जाचाला कंटाळून या महिलेने भाजपा कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते.महाराजगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नव्हती. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ इच्छित होती. मात्र तिची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे निराश होऊन या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश