शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पोलीस दल आहे प्रचंड तणावात, संघटनेअभावी प्रश्नांना फुटत नाही वाचा, मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 05:10 IST

Police News : पोलीस दल शारीरिक व मानसिक तणावात आहे. कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मुलांच्या वाढदिवसाला किंवा लग्नालाही सुटी नाकारली जाते. त्यामुळे अनेक जण आत्महत्येसारखे भावनिक निर्णय घेतात, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. 

 - खुशालचंद बाहेतीमदुराई : पोलीस दल शारीरिक व मानसिक तणावात आहे. कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मुलांच्या वाढदिवसाला किंवा लग्नालाही सुटी नाकारली जाते. त्यामुळे अनेक जण आत्महत्येसारखे भावनिक निर्णय घेतात, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षकांचे पगार व सुविधा वाढवण्याची व रिक्त जागा भरण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेत अंतरिम आदेश देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. पोलिसांची संघटना नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटत नाही. प्राथमिक शिक्षकांपेक्षाही पोलीस कर्मचाऱ्यांना कमी पगार आहे. अनेक वेळा पोलिसांना सलग २४-२४ तास काम करावे लागते. इतर सरकारी कर्मचारी आठवड्यात ५ दिवस काम करतात; पण पोलिसांना कित्येक दिवस सुटीही मिळत नाही. पोलिसांमध्ये तणाव व्यवस्थापनाचे कोणतेही नियोजन नसते. याचा परिणाम पोलिसांनी नोकरी सोडून देणे यामध्ये किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामध्ये होतो. अशी नोंद घेत उच्च न्यायालयाने सरकारला १८ मुद्यांवर माहिती मागितली आहे. यामध्ये पोलिसांचे वेतन, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, सुट्यांचे नियोजन, पोलिसांची गाऱ्हाणी सोडवण्यासाठी उपलब्ध यंत्रणा, अशा माहितीचा समावेश आहे. गेल्या १० वर्षांत किती पोलिसांनी आत्महत्या केल्या याचीही माहिती न्यायालयाने मागितली आहे. ही सर्व माहिती १७ डिसेंबरपर्यंत तात्काळ सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.  

जोपर्यंत पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यात येत नाहीत, त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देण्यात येत नाही, त्यांचे मनोबल उंच ठेवण्यात येत नाही, तोपर्यंत कायदा व सुव्यवस्था चांगली राहणे व गुन्ह्यास प्रतिबंध होणे किंवा गुन्हे उघडकीस येणे अत्यंत कठीण आहे.न्या. एन. किरूबकरन आणि बी. पुगलेंधी, मद्रास उच्च न्यायालय- खंडपीठ मदुराई

टॅग्स :PoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय