शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मित्रच मैत्रिणीवर अत्याचार करायला लागले तर काय करायचं? कोलकाता प्रकरणावर तृणमूल खासदाराचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:14 IST

कॉलेजमध्ये पोलिस तैनात करता येणार नाहीत असेही तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले

Kolkata Gangrape Case: कोलकाता येथील लॉ कॉलेज परिसरात एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील तीन आजी-माजी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मनोजित मिश्रा, जैब अहमद व प्रमित मुखोपाध्याय उर्फ प्रमित मुखर्जी अशी त्यांची नावे आहेत. पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्यानंतर बुधवारी रात्री आरोपींनी एका खोलीत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर राजकारणही तापलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

कोलकात्याच्या लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्काराची पुष्टी झाली आहे. कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (सीएनएमसी) येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी आतापर्यंत अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाने यापूर्वी पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पीडितेने नाकारल्यानंतर आरोपीने त्याच्या मित्रांसह हे कृत्य केले. 

पोलिसांच्या तपासादरम्यान, या प्रकरणाबाबत राजकीय वातावरणही तापू लागले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या घटनेबाबत एक विचित्र विधान केले आहे. जर एखादा मित्रच बलात्कार करायला लागला तर काय करायचं असा सवाल बॅनर्जी यांनी केला. "लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेच्या मी बाजूने नाही पण आरोपींना अटक झाली पाहिजे. काही लोक असे गुन्हे करतात पण जर एखाद्या मित्राने त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करु शकतो? शाळांमध्ये पोलीस असतील का? विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थिनीसोबत असे केले. तिचे (पीडित) संरक्षण कोण करेल? हे एक सरकारी कॉलेज आहे. पोलीस नेहमीच तिथे असतील का?" असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.

"महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये पोलिस तैनात करणे शक्य नाही. पुरुष सहकाऱ्यांचे कर्तव्य आहे की ते त्यांच्या महिला सहकाऱ्यांचे रक्षण करतील. जे लोक फिरत आहेत त्यांनी देखील विचार करावा की ते कोणासोबत फिरत आहेत. काही विकृत मानसिकतेचे लोक असे गुन्हे करतात. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांनी अशा लोकांविरुद्ध लढले पाहिजे, जरी ते सरकारी महाविद्यालय असले तरी. महाविद्यालय प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे," असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले.

कल्याण बॅनर्जींचे स्पष्टीकरण

दरम्यान, बलात्कार प्रकरणावर कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. "काही माध्यम संस्थांनी माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढला. मी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे समर्थन करत नाहीत आणि सर्व आरोपींना अटक करण्याच्या बाजूने आहे," असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिका