शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी

By admin | Updated: September 19, 2014 03:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : भारत-चीनच्या शिखर बैठकीवर लडाखमध्ये अलीकडे चीनने केलेल्या घुसखोरीच्या मुद्याचे सावट राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. सीमावादावर त्वरित तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 भारत भेटीवर आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत मोदींची झालेली शिखर बैठक चिनी लष्कराकडून भारताच्या हद्दीत होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर केंद्रित राहिली. सीमेवर शांतता आणि सलोखा कायम राखण्याबाबत दोन देशांमध्ये झालेल्या कराराचे कटाक्षाने पालन केले जावे, असेही मोदींनी स्पष्ट केले. 
बुधवारी अहमदाबाद येथील साबरमतीच्या किनारी जिनपिंग यांचे जोरदार स्वागत झाल्यानंतर दुस:या टप्प्यात गुरुवारी नवी दिल्लीत दोन नेते आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा तीन तास चालली. येत्या पाच वर्षात चीनने भारतात 2क् अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जिनपिंग भारत दौ:यावर असताना बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी चिनी लष्कराने भारताच्या चुमार आणि डेमचोक भागात घुसखोरी कायम ठेवल्याने हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. अहमदाबाद येथे बुधवारी चर्चेतही मोदींनी चिनी कुरापतींचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र सरकारने ही सदिच्छा चर्चा असल्याचे सांगत  अधिकृतरीत्या भाष्य टाळले होते. 
सीमेवर वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या घटनांबद्दल मी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संबंध पूर्ण क्षमतेने बळकट करण्यासाठी परस्पर विश्वास आवश्यक असून, सीमेवर शांतता आणि सलोखा राखणो हाच परस्पर विश्वासाचा पाया आहे. आमचे सीमेसंबंधी करार तसेच विश्वासनिर्मितीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (एलएसी) स्पष्टता आल्यास शांतता आणि सलोखा राखण्याच्या प्रयत्नांत मोठे योगदान लाभेल. मी जिनपिंग यांना सीमाप्रश्नी लवकर तोडगा काढण्याचे 
आवाहन केले आहे, असे मोदींनी 
चिनी अध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तोडग्यासाठी चीन कटिबद्ध..
च्सीमा अद्याप निश्चित नसल्यामुळे काही वेळा अशा घटना घडतात. सीमेसंबंधी यंत्रणा पाहता दोन्ही देश विविध स्तरावर प्रभावीरीत्या कृती करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे अशा घटनांचा द्विपक्षीय संबंधावर परिणाम होणार नाही. सीमाप्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी भारतासोबत मित्रत्वाच्या नात्याने सल्लामसलत करण्यास चीन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शी यांनी दिली.  दुस:या दिवशी दोन देशांदरम्यान 12 करार झाले असून त्यात भारतात चिनी औद्योगिक पार्कची उभारणी, रेल्वेत गुंतवणूक यासारखे महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.
 
हैदराबाद हाऊसबाहेर तिबेटींची निदर्शने..
मोदी आणि शी यांची चर्चा सुरू असलेल्या हैदराबाद हाऊसबाहेर तिबेटींनी निदर्शने केली. त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला.