शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:11 IST

शहीद हवालदार झंटू अली शेख यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भाऊ सुभेदार रफिकुल शेख यांचे अंगावर काटा आणणारे भाषण केले.

Martyred Havaldar Jhantu Ali Sheikh: उधमपूरमधील दुडू-बसंतगड भागात २४ एप्रिल रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा एक जवान शहीद झाला. हवालदार झंटू अली शेख, असे या शहीद जवानाचे नाव होते आणि ते स्पेशल फोर्सेसच्या ६ पॅरा ट्रुपचा भाग होते. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान शहीद झालेले  जवान झंटू अली शेख यांना पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने दफन करण्यात आले. झंटू अली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान, झंटू अली शेख यांचे भाऊ रफीकुल शेख यांनी दिलेले अंगावर काटा आणणारे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या गावात हवालदार झंटू अली शेख यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीनवेळा गोळीबार करुन झंटू शेख यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी झंटू यांचे मोठे भाऊ सुभेदार रफिकुर अली शेख यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. माझ्यासाठी देश आधी येतो, नंतर कुटुंब येते असे रफिकुर अली शेख म्हणाले.

"दहशतवाद्यांनी माझा भाऊ झंटू अली याच्यावर मागून हल्ला केला. आपले काम त्याच्या हौतात्म्याचा बदला घेणे आहे. आपण बदला घेऊ किंवा मरू. माझ्या भावाला दोन मुले आहेत. कृपया त्यांच्यासाठी काही व्यवस्था करा. मला अभिमान आहे की माझ्या भावाने देशासाठी आपले जीवन दिले. दुःख खूप आहे. पण लाखो लोकांपैकी काहींनाच देशासाठी मरण्याची संधी मिळते. तो केवळ आमच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण नादिया जिल्ह्याचा आणि बंगालचा अभिमान आहे," असे रफिकुर अली शेख यांनी म्हटलं.

"मी माझ्या भावाच्या मुलाला आणि मुलीला सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी देश आधी येतो आणि नंतर कुटुंब. माझे कर्तव्य प्रथम देशाप्रती आहे. मी देशसेवेला प्रथम प्राधान्य देईन. आम्ही सैनिक आहोत, सैनिकांना कोणताही धर्म आणि जात नसते. भारतीय सैन्याला कोणताही धर्म नाही. आपण एकाच भांड्यातून खातो आणि पितो. सैन्यात कोणताही भेदभाव नाही. जर कोणात हिंमत असेल तर त्याने सांगावे की भारतीय सैन्य हिंदू आहे की मुस्लिम. भारतीय सैन्य ही अशी गोष्ट आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध एकाच ताटात जेवतात आणि सर्वांना एकाच भांड्यात जेवण वाढले जाते. जर कोणाला बंधुता पहायची असेल तर सैन्याला भेटायला जा. मग तुम्हाला कळेल की बंधुता म्हणजे काय," असेही  सुभेदार रफिकुर अली शेख यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwest bengalपश्चिम बंगालIndian Armyभारतीय जवान