शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
3
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
4
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
5
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
8
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
9
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
10
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
11
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
12
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
13
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
14
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
15
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
16
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
17
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
18
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
19
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
20
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध

"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:11 IST

शहीद हवालदार झंटू अली शेख यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भाऊ सुभेदार रफिकुल शेख यांचे अंगावर काटा आणणारे भाषण केले.

Martyred Havaldar Jhantu Ali Sheikh: उधमपूरमधील दुडू-बसंतगड भागात २४ एप्रिल रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा एक जवान शहीद झाला. हवालदार झंटू अली शेख, असे या शहीद जवानाचे नाव होते आणि ते स्पेशल फोर्सेसच्या ६ पॅरा ट्रुपचा भाग होते. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान शहीद झालेले  जवान झंटू अली शेख यांना पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने दफन करण्यात आले. झंटू अली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान, झंटू अली शेख यांचे भाऊ रफीकुल शेख यांनी दिलेले अंगावर काटा आणणारे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या गावात हवालदार झंटू अली शेख यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीनवेळा गोळीबार करुन झंटू शेख यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी झंटू यांचे मोठे भाऊ सुभेदार रफिकुर अली शेख यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. माझ्यासाठी देश आधी येतो, नंतर कुटुंब येते असे रफिकुर अली शेख म्हणाले.

"दहशतवाद्यांनी माझा भाऊ झंटू अली याच्यावर मागून हल्ला केला. आपले काम त्याच्या हौतात्म्याचा बदला घेणे आहे. आपण बदला घेऊ किंवा मरू. माझ्या भावाला दोन मुले आहेत. कृपया त्यांच्यासाठी काही व्यवस्था करा. मला अभिमान आहे की माझ्या भावाने देशासाठी आपले जीवन दिले. दुःख खूप आहे. पण लाखो लोकांपैकी काहींनाच देशासाठी मरण्याची संधी मिळते. तो केवळ आमच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण नादिया जिल्ह्याचा आणि बंगालचा अभिमान आहे," असे रफिकुर अली शेख यांनी म्हटलं.

"मी माझ्या भावाच्या मुलाला आणि मुलीला सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी देश आधी येतो आणि नंतर कुटुंब. माझे कर्तव्य प्रथम देशाप्रती आहे. मी देशसेवेला प्रथम प्राधान्य देईन. आम्ही सैनिक आहोत, सैनिकांना कोणताही धर्म आणि जात नसते. भारतीय सैन्याला कोणताही धर्म नाही. आपण एकाच भांड्यातून खातो आणि पितो. सैन्यात कोणताही भेदभाव नाही. जर कोणात हिंमत असेल तर त्याने सांगावे की भारतीय सैन्य हिंदू आहे की मुस्लिम. भारतीय सैन्य ही अशी गोष्ट आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध एकाच ताटात जेवतात आणि सर्वांना एकाच भांड्यात जेवण वाढले जाते. जर कोणाला बंधुता पहायची असेल तर सैन्याला भेटायला जा. मग तुम्हाला कळेल की बंधुता म्हणजे काय," असेही  सुभेदार रफिकुर अली शेख यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwest bengalपश्चिम बंगालIndian Armyभारतीय जवान