शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
5
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
6
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
7
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
8
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
9
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
10
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
11
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
12
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
13
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
14
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
15
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
17
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
18
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
19
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
20
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
Daily Top 2Weekly Top 5

"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:11 IST

शहीद हवालदार झंटू अली शेख यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भाऊ सुभेदार रफिकुल शेख यांचे अंगावर काटा आणणारे भाषण केले.

Martyred Havaldar Jhantu Ali Sheikh: उधमपूरमधील दुडू-बसंतगड भागात २४ एप्रिल रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा एक जवान शहीद झाला. हवालदार झंटू अली शेख, असे या शहीद जवानाचे नाव होते आणि ते स्पेशल फोर्सेसच्या ६ पॅरा ट्रुपचा भाग होते. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान शहीद झालेले  जवान झंटू अली शेख यांना पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने दफन करण्यात आले. झंटू अली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान, झंटू अली शेख यांचे भाऊ रफीकुल शेख यांनी दिलेले अंगावर काटा आणणारे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या गावात हवालदार झंटू अली शेख यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीनवेळा गोळीबार करुन झंटू शेख यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी झंटू यांचे मोठे भाऊ सुभेदार रफिकुर अली शेख यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. माझ्यासाठी देश आधी येतो, नंतर कुटुंब येते असे रफिकुर अली शेख म्हणाले.

"दहशतवाद्यांनी माझा भाऊ झंटू अली याच्यावर मागून हल्ला केला. आपले काम त्याच्या हौतात्म्याचा बदला घेणे आहे. आपण बदला घेऊ किंवा मरू. माझ्या भावाला दोन मुले आहेत. कृपया त्यांच्यासाठी काही व्यवस्था करा. मला अभिमान आहे की माझ्या भावाने देशासाठी आपले जीवन दिले. दुःख खूप आहे. पण लाखो लोकांपैकी काहींनाच देशासाठी मरण्याची संधी मिळते. तो केवळ आमच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण नादिया जिल्ह्याचा आणि बंगालचा अभिमान आहे," असे रफिकुर अली शेख यांनी म्हटलं.

"मी माझ्या भावाच्या मुलाला आणि मुलीला सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी देश आधी येतो आणि नंतर कुटुंब. माझे कर्तव्य प्रथम देशाप्रती आहे. मी देशसेवेला प्रथम प्राधान्य देईन. आम्ही सैनिक आहोत, सैनिकांना कोणताही धर्म आणि जात नसते. भारतीय सैन्याला कोणताही धर्म नाही. आपण एकाच भांड्यातून खातो आणि पितो. सैन्यात कोणताही भेदभाव नाही. जर कोणात हिंमत असेल तर त्याने सांगावे की भारतीय सैन्य हिंदू आहे की मुस्लिम. भारतीय सैन्य ही अशी गोष्ट आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध एकाच ताटात जेवतात आणि सर्वांना एकाच भांड्यात जेवण वाढले जाते. जर कोणाला बंधुता पहायची असेल तर सैन्याला भेटायला जा. मग तुम्हाला कळेल की बंधुता म्हणजे काय," असेही  सुभेदार रफिकुर अली शेख यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwest bengalपश्चिम बंगालIndian Armyभारतीय जवान