शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:11 IST

शहीद हवालदार झंटू अली शेख यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भाऊ सुभेदार रफिकुल शेख यांचे अंगावर काटा आणणारे भाषण केले.

Martyred Havaldar Jhantu Ali Sheikh: उधमपूरमधील दुडू-बसंतगड भागात २४ एप्रिल रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा एक जवान शहीद झाला. हवालदार झंटू अली शेख, असे या शहीद जवानाचे नाव होते आणि ते स्पेशल फोर्सेसच्या ६ पॅरा ट्रुपचा भाग होते. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान शहीद झालेले  जवान झंटू अली शेख यांना पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने दफन करण्यात आले. झंटू अली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान, झंटू अली शेख यांचे भाऊ रफीकुल शेख यांनी दिलेले अंगावर काटा आणणारे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील त्यांच्या गावात हवालदार झंटू अली शेख यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीनवेळा गोळीबार करुन झंटू शेख यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी झंटू यांचे मोठे भाऊ सुभेदार रफिकुर अली शेख यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. माझ्यासाठी देश आधी येतो, नंतर कुटुंब येते असे रफिकुर अली शेख म्हणाले.

"दहशतवाद्यांनी माझा भाऊ झंटू अली याच्यावर मागून हल्ला केला. आपले काम त्याच्या हौतात्म्याचा बदला घेणे आहे. आपण बदला घेऊ किंवा मरू. माझ्या भावाला दोन मुले आहेत. कृपया त्यांच्यासाठी काही व्यवस्था करा. मला अभिमान आहे की माझ्या भावाने देशासाठी आपले जीवन दिले. दुःख खूप आहे. पण लाखो लोकांपैकी काहींनाच देशासाठी मरण्याची संधी मिळते. तो केवळ आमच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण नादिया जिल्ह्याचा आणि बंगालचा अभिमान आहे," असे रफिकुर अली शेख यांनी म्हटलं.

"मी माझ्या भावाच्या मुलाला आणि मुलीला सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी देश आधी येतो आणि नंतर कुटुंब. माझे कर्तव्य प्रथम देशाप्रती आहे. मी देशसेवेला प्रथम प्राधान्य देईन. आम्ही सैनिक आहोत, सैनिकांना कोणताही धर्म आणि जात नसते. भारतीय सैन्याला कोणताही धर्म नाही. आपण एकाच भांड्यातून खातो आणि पितो. सैन्यात कोणताही भेदभाव नाही. जर कोणात हिंमत असेल तर त्याने सांगावे की भारतीय सैन्य हिंदू आहे की मुस्लिम. भारतीय सैन्य ही अशी गोष्ट आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध एकाच ताटात जेवतात आणि सर्वांना एकाच भांड्यात जेवण वाढले जाते. जर कोणाला बंधुता पहायची असेल तर सैन्याला भेटायला जा. मग तुम्हाला कळेल की बंधुता म्हणजे काय," असेही  सुभेदार रफिकुर अली शेख यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwest bengalपश्चिम बंगालIndian Armyभारतीय जवान