शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 10:29 IST

दर महिन्याला 150 कोटी रुपयांची वसुली करण्याचं लक्ष्य

नवी दिल्ली: नीरव मोदीनं तब्बल 13 हजार कोटी बुडवल्यानं संकटात सापडलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं आता कर्जवसुलीसाठी कंबर कसली आहे. पीएनबीनं कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात अनोखं अभियान सुरू केलं. या अभियानांतर्गत बँकेचे कर्मचारी गांधीगिरीच्या मार्गानं कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पीएनबीचे कर्मचारी कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या कार्यालयात फलक घेऊन बसतात. यामुळे पैसे बुडवणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटेल आणि ते कर्जाची परतफेड करतील, अशी आशा पीएनबीला आहे. या माध्यमातून महिन्याकाठी 150 कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचं लक्ष्य बँकेनं ठेवलं आहे. 'पीएनबी'चं मिशन गांधीगिरी अभियान एक वर्ष चालणार आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीनं 13 हजार कोटींचं कर्ज बुडवल्यानं पीएनबीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यामुळेच आता बँकेनं कर्जवसुलीसाठी गांधीगिरी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत बँक कर्मचाऱ्यांची टीम पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन बसते. या टीमकडून कोणतीही घोषणाबाजी केली जात नाही. सध्या या गांधीगिरी अभियानात बँकेच्या 1,144 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. कर्जदारांशी चर्चा सुरू व्हावी, त्यातून दर महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयांचं कर्ज वसूल व्हावं, यासाठी गांधीगिरी अभियान सुरू केल्याची माहिती बँकेनं प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. बँकेनं हेतुपुरस्पर कर्ज बुडवणाऱ्यांची यादी तयार केली असून त्यात 1,084 लोकांच्या नावांचा समावेश आहे. यातील 220 जणांचे फोटो बँकेनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या 150 जणांचे पासपोर्ट गेल्या काही महिन्यांमध्ये जप्त करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा