शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

PNB महाघोटाळा : बॅंकेत तुमच्या जमा प्रत्येक 100 रूपयांपैकी 30 रूपये गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:15 IST

देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबई शाखेत जवळपास 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई: देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबई शाखेत जवळपास 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील एका शाखेतून ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी बेकायदा व्यवहार होत होता. घोटाळ्याची ही रक्कम बॅंकेच्या एकूण बाजार मुल्याच्या(मार्केट कॅपिटलायझेशन) जवळपास एक तृतियांश आहे. त्यामुळे शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सला 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे तर सामान्य खातेधारकाला त्याच्या बॅंकेत जमा असलेल्या प्रत्येक 100 रूपयांमागे 30 रूपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं असा दाट अंदाजही वर्तवला जात आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार पंजाब नॅशनल बॅंकेचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 36 हजार 566 कोटी रूपये आहे आणि त्यांनी जवळपास 4.5 लाख कोटी रूपये मार्केटमध्ये कर्ज दिलं आहे. बॅंकेतील घोटाळ्याच्या वृत्तानंतर गुंतवणुकदारांना एक दिवसात जवळपास 3 हजार कोटी रूपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. बँकेने या घोटाळ्याविषयी मुंबई शेअर बाजाराला माहिती दिली आहे.या घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने अद्याप जाहीर केलेली नाहीत. मात्र, त्यांची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे, असे बँकेने सांगितले.सामान्यतः कोणत्याही बॅंकेत दोन पद्धतीने पैशांचा व्यवहार होतो. पहिला पर्याय म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि दुसरा पर्याय म्हणजे बॅंकेचे ग्राहक जे आपले पैसे व्याजासाठी बॅंकेत जमा करतात. कॉर्पोरेट देखील शेअर्सच्या माध्यमातून बॅंकेत जमा पैसा करत असतात. या घोटाळ्यामध्ये खोट्या ट्रान्झेक्शनद्वारे घोळ केल्याचं बॅंकेनं सांगितलं आहे, म्हणजे पैसे शेअर होल्डरकडून जमा करण्यात आले नव्हते हे स्पष्ट होतं. तसंच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानेही हे पैसे दिले नव्हतेच. अशावेळेस खोट्या ट्रान्झेक्शनमुळे कोणाचं नुकसान होतं तर बॅंकेच्या लाखो सामान्य खातेधारकांचं.  जर बॅंक खोट्या ट्रान्झेक्शनमुळे घोटाळा झाल्याचं म्हणत असेल तर बॅंकेकडे या ट्रान्झेक्शनची कोणती माहिती उपलब्ध नाहीये. त्यामुळे खोट्या ट्रान्झेक्शनद्वारे पैसे कुठे ट्रान्सफर झाले हे माहित करून घेण्यासही बॅंक सक्षम नाही. म्हणजे हे पैसे परत मिळवण्याच्या परिस्थितित बॅंक असण्याची शक्यताही कमीच आहे. शेवटचा पर्याय म्हणजे जर बॅंकेला एकूण मार्केट कॅपिटलायझेशनच्या एक तृतिशांश नुकसान झालंय तर याची नुकसान भरपाई बॅंकेच्या खातेधारकांच्या पैशांमधून केली जाईल. अशा परिस्थितीत जर बॅंकेत एखाद्या ग्राहकाचे 100 रूपये जमा असतील तर त्याला 30 रूपयांवर पाणी सोडावं लागेल.  

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकMumbaiमुंबई