शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

पीएमसी ग्राहकांना आपत्कालीन स्थितीत मिळणार १ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:49 AM

आरबीआयची उच्च न्यायालयाला माहिती : प्रशासकाशी संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ठेवीदारांना काही वैद्यकीय कारणास्तव बँकेतून पैसे काढायचे असल्यास ते प्रशासकांशी संपर्क साधू शकतात. मात्र, ही मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती आरबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.पीएमसी बँकेमधून पैसे काढण्याच्या मर्यादेवर आरबीआयने घातलेल्या निर्बंधाविरुद्ध बँकेच्या अनेक ठेवीदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर उत्तर देत आरबीआयने मंगळवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘विवाह, शिक्षण, उदरनिर्वाह चालवायचा असल्यास किंवा अन्य काही कठीण प्रसंगी बँकेतून ५० हजार रुपये काढण्याची मुभा ठेवीदारांना दिली आहे,’ असे आरबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.जे ठेवीदार कठीण प्रसंगातून जात आहेत, त्यांनी आरबीआयने बँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकांशी संपर्क साधावा, असे आरबीआयच्या वतीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले. बँक व ठेवीदारांच्या हितासाठी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या घोटाळ्यास जबाबदार असलेल्यांची माहिती समोर आली आहे, असेही आरबीआयने न्यायालयाला सांगितले.पीएमसी बँकेच्या आर्थिक अनियमिततेमुळे २३ सप्टेंबर रोजी आरबीआयने या बँकेतून पैसे काढण्यावर सहा महिने मर्यादा घातली. यामुळे अनेक ठेवीदारांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. तर या धक्क्याने काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. ‘ठेवीदारांचा त्रास कमी करण्यासाठी आरबीआयने बँकेवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. आपत्कालीन स्थितीत मर्यादेपेक्षा अधिक रक्कम बँकेतून काढता यावी, यासाठी ठेवीदारांनी प्रशासकांकडे अर्ज करावा. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ठेवीदारांना एक लाख रुपये बँकेतून काढता येतील. तर विवाह, शिक्षण, उदरनिर्वाह व अन्य कठीण प्रसंगात बॅँकेतून ५० हजार रुपये काढता येतील,’ असे आरबीआयच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. हे प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी ४ डिसेंबर रोजी ठेवली.सुरुवातीला पीएमसी बँकेतून एक हजार रुपये काढण्याची मुभा आरबीआयने ठेवीदारांना दिली. मात्र, ठेवीदारांनी याबाबत तीव्र निषेध व्यक्त केल्यावर ही मर्यादा १० हजार रुपये इतकी वाढविण्यात आली. सध्या ही मर्यादा ५० हजार रुपये इतकी आहे.हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) या कंपनीकडून कोणतीही सिक्युरिटीज न घेता कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याने पीएमसी बँकेवर ही वेळ ओढवली. आरबीआय याबाबत पडताळणी करीत आहे. तर या घोटाळ्यातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरबीआय मुर्दाबाद!पीएमसी बँकेच्या संदर्भातील सुनावणी असल्याने उच्च न्यायालयात बँकेच्या ठेवीदारांनी गर्दी केली. ठेवीदारांची गर्दी पाहून न्यायालयाच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. काही वेळानंतर ठेवीदारांनी आरबीआय व पीएमसी बँकेच्याविरोधात घोषणा केल्या. उच्च न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर ठेवीदार जमा झाल्याने येथे काही काळासाठी वाहतूककोंडीही झाली. अखेर पोलिसांनी जमावाची पांगापांग केली.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक