शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दिल्लीच्या विकासासाठी हवे पंतप्रधानांचे आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 06:04 IST

अरविंद केजरीवाल; तुमच्या मुलाने आज तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण झाले. पण आता निवडणूक संपली आहे आणि त्यासोबत राजकीय शत्रुत्वही संपले आहे. यापुढे सर्व पक्षांसोबत काम करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचे आहे, असे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केले. रामलीला मैदानावर शपथविधीनंतर त्यांनी दिल्लीकरांशी संवाद साधला. दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि त्यांच्या  नेतृत्वातील केंद्र सरकारने आशीर्वाद द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अश्या घोषणांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘मेरे प्यारे दिल्लीवासीयों’ असा उल्लेख करताच रामलीला मैदानावर टाळ््यांचा कडकडाट झाला. केजरीवाल म्हणाले की, आज तुमच्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेली पाच वर्षे दिल्लीतील प्रत्येक परिवारात आनंद पेरण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही तेच करणार आहे. आता तुम्ही आपापल्या गावी फोन करून सांगा...‘हमारा बेटा सीएम बन गया है’.या निवडणुकीत कुणी आम्हाला, कुणी भाजपला, तर कुणी काँग्रेसला मत दिले. पण आजपासून मी काँग्रेस आणि भाजपवाल्यांचाही मुख्यमंत्री आहे. गेली पाच वर्षे कुणासोबतही सावत्र व्यवहार केला नाही आणि पुढेही करणार नाही. एखादी वस्ती भाजपला मत देणार आहे, हे माहिती असतानाही त्यांचे काम केले. कारण तेदेखील माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत, याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.‘जगभरात डंका वाजवू’या निवडणुकीमुळे संपूर्ण देशात दिल्लीचा डंका वाजू लागला आहे. कुणी मोहल्ला क्लिनिकच्या धरतीवर योजना आणत आहेत, तर कुणी वीज मोफत देत आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण जगात दिल्लीचा डंका वाजेल, असे काम करण्याचा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.‘आम्ही माफ केले’‘निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खूप राजकारण झाले. आमच्याबद्दल बरेच काही बोलले गेले. पण, आता आम्ही त्यांना माफ केले आहे. आमच्यापासून कुणी दुखावले असेल तर त्यांनीही झाले गेले विसरून जावे,’ असे आवाहन केजरीवाल यांनी केले.५० विशेष निमंत्रितसोहळ््यात मुख्य आकर्षण होते मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला उपस्थित असलेले ५० विशेष निमंत्रित. सफाई कामगार, रिक्षाचालक, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, खेळाडू, विद्यार्थी, शहीद जावानांचे कुटुंबिय आदी सर्वच क्षेत्रातील या मान्यवरांचा अनोखा सन्मान यावेळी झाला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी