शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या विकासासाठी हवे पंतप्रधानांचे आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 06:04 IST

अरविंद केजरीवाल; तुमच्या मुलाने आज तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण झाले. पण आता निवडणूक संपली आहे आणि त्यासोबत राजकीय शत्रुत्वही संपले आहे. यापुढे सर्व पक्षांसोबत काम करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचे आहे, असे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केले. रामलीला मैदानावर शपथविधीनंतर त्यांनी दिल्लीकरांशी संवाद साधला. दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि त्यांच्या  नेतृत्वातील केंद्र सरकारने आशीर्वाद द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अश्या घोषणांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘मेरे प्यारे दिल्लीवासीयों’ असा उल्लेख करताच रामलीला मैदानावर टाळ््यांचा कडकडाट झाला. केजरीवाल म्हणाले की, आज तुमच्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेली पाच वर्षे दिल्लीतील प्रत्येक परिवारात आनंद पेरण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही तेच करणार आहे. आता तुम्ही आपापल्या गावी फोन करून सांगा...‘हमारा बेटा सीएम बन गया है’.या निवडणुकीत कुणी आम्हाला, कुणी भाजपला, तर कुणी काँग्रेसला मत दिले. पण आजपासून मी काँग्रेस आणि भाजपवाल्यांचाही मुख्यमंत्री आहे. गेली पाच वर्षे कुणासोबतही सावत्र व्यवहार केला नाही आणि पुढेही करणार नाही. एखादी वस्ती भाजपला मत देणार आहे, हे माहिती असतानाही त्यांचे काम केले. कारण तेदेखील माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत, याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.‘जगभरात डंका वाजवू’या निवडणुकीमुळे संपूर्ण देशात दिल्लीचा डंका वाजू लागला आहे. कुणी मोहल्ला क्लिनिकच्या धरतीवर योजना आणत आहेत, तर कुणी वीज मोफत देत आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण जगात दिल्लीचा डंका वाजेल, असे काम करण्याचा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.‘आम्ही माफ केले’‘निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खूप राजकारण झाले. आमच्याबद्दल बरेच काही बोलले गेले. पण, आता आम्ही त्यांना माफ केले आहे. आमच्यापासून कुणी दुखावले असेल तर त्यांनीही झाले गेले विसरून जावे,’ असे आवाहन केजरीवाल यांनी केले.५० विशेष निमंत्रितसोहळ््यात मुख्य आकर्षण होते मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला उपस्थित असलेले ५० विशेष निमंत्रित. सफाई कामगार, रिक्षाचालक, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, खेळाडू, विद्यार्थी, शहीद जावानांचे कुटुंबिय आदी सर्वच क्षेत्रातील या मान्यवरांचा अनोखा सन्मान यावेळी झाला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी