शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

निलंबनाने पंतप्रधान नाराज, मोदींनी फटकारल्यानंतर निलंबन रद्द करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:28 IST

विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते.

संजय शर्मा

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांची नाराजी पाहून खासदारांच्या निलंबन वापसीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेच्या १३ व राज्यसभेच्या एका खासदाराला संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. या मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ व निदर्शनांमुळे आजही संसदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतिम अधिवेशन असेल. यानंतर फेब्रुवारीमध्ये लेखानुदानासाठी औपचारिकरीत्या अधिवेशन बोलावले जाईल. परंतु, ते पूर्ण अधिवेशन समजले जात नाही.

साेमवारी ताेडगा?

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाने नाराज आहेत. पंतप्रधानांनी गुरूवारी सकाळी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सरकारच्या रणनीतीकारांना सांगितले होते की, या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये.

कोणत्याही त्रुटी असतील तर त्या कमी करण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या या निर्देशानंतरही १४ खासदारांच्या निलंबनाने राजकीय रंग घेतला आहे. पंतप्रधानांनी फटकारल्यानंतर आता सरकारचे रणनीतीकार निलंबन परत घेण्याबाबतचा मार्ग शोधत आहेत.

विरोधी पक्षांच्या नेत्यांशी आता मागील दाराने चर्चा सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या सोमवारी या मुद्द्याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या?

आदेश रावल

नवी दिल्ली : दोन दिवसांपासून संसदेतील गोंधळ कायम आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी १३ डिसेंबरच्या घटनेवर सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, सरकारकडून सभागृहात कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. गृहमंत्री शाह सभागृहात येऊन संपूर्ण घटनेवर निवेदन करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू शकणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

संपूर्ण विरोधी गट ‘इंडिया’ची एकच मागणी आहे की, सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या, हे सरकारने सभागृहाला सांगावे. प्रत्यक्षात या घटनेपासून आतापर्यंत दिल्ली पोलिसांनीही मौन बाळगले आहे.

एका मिनिटात संसद पडली ठप्प

विरोधी सदस्यांनी सतत गदारोळ केल्यामुळे शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेत एका मिनिटांत कामकाज ठप्प पडले. यामुळे गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके रखडली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद