शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

PM मोदींनी लाल किल्ल्यावरुन हिशोबच दिला, १० वर्षाचा जमा-खर्च मांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 09:17 IST

मोदींनी आपल्या सर्वसमावेश भाषणात भविष्यातील अनेक बदलांचे संकेत दिले. तसेच, गेल्या १० वर्षातील जमा-खर्चाचा हिशोबच मांडत असल्याचेही म्हटले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशवासीयांना संबोधत भाषण केले. आपल्या भाषणाची सुरुवात यावेळी मोदींनी मेरे प्यारे परिवारजन म्हणत केली. देशातील १४० कोटी भारतीयांना उद्देशून मोदींनी कुटुंबातील सदस्य असल्याचा उल्लेख आजच्या संपूर्ण भाषणात केला. भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी मणिपूरचा उल्लेख करत आता मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचं म्हटलं. देश मणिपूरच्या नागरिकांसोबत आहे. मणीपूरने गेल्या काही दिवसांत जी शांतता राखली आहे. तशीच राखावी, कारण यातूनच समाधानाचा मार्ग निघेल, असे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या सर्वसमावेश भाषणात भविष्यातील अनेक बदलांचे संकेत दिले. तसेच, गेल्या १० वर्षातील जमा-खर्चाचा हिशोबच मांडत असल्याचेही म्हटले.

देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून सलग १० व्यांदा तिरंगा ध्वज फडकावल्यानंतर, पंतप्रधान उपस्थित नागरिकांना संबोधित करत होते. यावेळी, मणिपूर ते मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कामगार, कारागिर यांपर्यंत सर्वांचा विषयांना प्राधान्य देत मोदींनी भाषण केले. 

गेल्या काही आठवड्यांत इशान्य भारतात विशेषतः मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतरही काही भागांत, मात्र प्रामुख्याने मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानासोबत जो प्रकार घडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहे. त्यासाठी सरकारही योग्य ते प्रयत्न करत करत राहील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आज मणिपूरच्या नागरिकांना दिला. त्यानंतर, सर्वसमावेश भाषण करताना मोदींनी गेल्या १० वर्षातील जमा-खर्चाची संक्षिप्त आकडेवारीच मी देशवासीयांना देत असल्याचे सांगत. काही आकडेवारीही जाहीर केली. 

मी लाल किल्ल्याच्या प्राचीन ऐतिहासिक स्थळावरुन गेल्या १० वर्षातील हिशोब देशवासीयांना देत आहे. १० वर्षांपूर्वी राज्यांना ३० लाख कोटी रुपये भारत सरकारतकडून जात होते. गेल्या ९ वर्षात हा आकडा १०० लाख कोटी रुपयांवर येऊन पोहोचला आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी ७० हजार कोटी रुपये दिले जात होते. आता, हा आकडा ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगितले. तसेच, गरिबांच्या घरासाठी यापूर्वी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. आता, ४ लाख कोटी रुपये गरिबांच्या घरासाठी खर्च केले जात आहेत. गेल्या ५ वर्षात १३.५० कोटी भारतीय गरिबीतून मध्यमवर्गीयांत वर्ग झाले असल्याचंही मोदींनी सांगितलं. यांसह विविध आकडेवारी आहे, पण मी ती इथं सांगत नाही, असे म्हणत मोदींनी आपल्या भाषणातील इतर मुद्द्यांवर बोलण्यास सुरुवात केली. 

२०१४ मध्ये आम्ही देशाची सुत्रे हाती घेतली, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगात १० व्या स्थानी होती. गेल्या, ९ वर्षात झालेल्या आर्थिक बदलातून भारताची अर्थव्यवस्था जगाच्या ५ व्या स्थानी आली आहे, यापूर्वी भ्रष्टाचाराच्या विळख्यात देश अडकला होता, असेही मोदींनी म्हटले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाIndependence Dayस्वातंत्र्य दिनHomeसुंदर गृहनियोजन