शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

नरेंद्र मोदींची लाट राज्यांमध्ये पोहोचली; आठ वर्षांत ७ वरून १८ राज्यांत भाजप सत्तेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 08:37 IST

आज सत्ता असली तरी आगामी काळात ती पुन्हा मिळवायला खूप कष्ट घ्यावे लागतात, हे सत्य भाजपला नीट उमगले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ साली सत्तेवर आले, तेव्हा भाजप फक्त ७ राज्यांमध्ये सत्तेवर होता. पण आता हा पक्ष १७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर आहे. हा आकडा २०१४च्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे.

१४४’चा फॉर्म्युला

आज सत्ता असली तरी आगामी काळात ती पुन्हा मिळवायला खूप कष्ट घ्यावे लागतात, हे सत्य भाजपला नीट उमगले आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी १४४ जागा की जिथे भाजपचे फार सामर्थ्य नाही, त्या जागांवर अधिक लक्ष देण्याचे भाजपने ठरवले आहे. मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत फटका बसला तर या ‘१४४’ जागांपैकी जिथे यश मिळेल त्यातून भाजपला विजयाचे संतुलन राखता येईल.

कशी आहे रणनीती?

१४४ लोकसभा जागांच्या कक्षेत येणाऱ्या विधानसभा जागांची बारीकसारीक माहिती गोळा केली जात आहे. बूथ पातळीवर पक्ष अधिक मजबूत कसा करता येईल, याकडे भाजपचे नेते लक्ष देतील. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल. 

तीन स्तरांवर काम 

भाजपची एक केंद्रीय समिती असेल, ज्यात राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे. ही समिती या १४४ लोकसभा जागांवरील पक्ष संघटनेच्या स्थितीचा वेळोवेळी आढावा घेईल. दुसऱ्या स्तरावर भाजपची राज्यातील समिती नेमके कोणते मुद्दे प्राधान्याने जनतेसमोर आणायचे व या १४४ जागांवर कशा पद्धतीने ते मांडायचे, याचा ऊहापोह होणार आहे. तिसऱ्या स्तरात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेली एक क्लस्टर समिती केंद्रीय व राज्य पातळीवरील समित्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहे.

प्रत्येक जागेसाठी प्रवक्ता

२०२४ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन प्रत्येक लोकसभा जागेकरिता एक प्रसारमाध्यम प्रवक्ता भाजप नेमणार आहे. 

अनेक अडचणींवर मात

प्रस्थापित सरकार विरोधातील जनभावना, शेतकऱ्यांचे आंदोलन, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दलची (सीएए) तीव्र नाराजी अशा अनेक अडचणींशी झुंजत भाजपने स्वतःचा उत्तर भारतापासून ते दक्षिण भारत, ईशान्य भारतापर्यंत मोठा विस्तार केला आहे. सध्यापेक्षा २०१८मध्ये स्थिती आणखी उत्तम होती. त्यावेळी २१ राज्यांमध्ये भाजप सत्ताधीश होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा