शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नरेंद्र मोदींची लाट राज्यांमध्ये पोहोचली; आठ वर्षांत ७ वरून १८ राज्यांत भाजप सत्तेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 08:37 IST

आज सत्ता असली तरी आगामी काळात ती पुन्हा मिळवायला खूप कष्ट घ्यावे लागतात, हे सत्य भाजपला नीट उमगले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ साली सत्तेवर आले, तेव्हा भाजप फक्त ७ राज्यांमध्ये सत्तेवर होता. पण आता हा पक्ष १७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर आहे. हा आकडा २०१४च्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे.

१४४’चा फॉर्म्युला

आज सत्ता असली तरी आगामी काळात ती पुन्हा मिळवायला खूप कष्ट घ्यावे लागतात, हे सत्य भाजपला नीट उमगले आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी १४४ जागा की जिथे भाजपचे फार सामर्थ्य नाही, त्या जागांवर अधिक लक्ष देण्याचे भाजपने ठरवले आहे. मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत फटका बसला तर या ‘१४४’ जागांपैकी जिथे यश मिळेल त्यातून भाजपला विजयाचे संतुलन राखता येईल.

कशी आहे रणनीती?

१४४ लोकसभा जागांच्या कक्षेत येणाऱ्या विधानसभा जागांची बारीकसारीक माहिती गोळा केली जात आहे. बूथ पातळीवर पक्ष अधिक मजबूत कसा करता येईल, याकडे भाजपचे नेते लक्ष देतील. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल. 

तीन स्तरांवर काम 

भाजपची एक केंद्रीय समिती असेल, ज्यात राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे. ही समिती या १४४ लोकसभा जागांवरील पक्ष संघटनेच्या स्थितीचा वेळोवेळी आढावा घेईल. दुसऱ्या स्तरावर भाजपची राज्यातील समिती नेमके कोणते मुद्दे प्राधान्याने जनतेसमोर आणायचे व या १४४ जागांवर कशा पद्धतीने ते मांडायचे, याचा ऊहापोह होणार आहे. तिसऱ्या स्तरात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेली एक क्लस्टर समिती केंद्रीय व राज्य पातळीवरील समित्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहे.

प्रत्येक जागेसाठी प्रवक्ता

२०२४ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन प्रत्येक लोकसभा जागेकरिता एक प्रसारमाध्यम प्रवक्ता भाजप नेमणार आहे. 

अनेक अडचणींवर मात

प्रस्थापित सरकार विरोधातील जनभावना, शेतकऱ्यांचे आंदोलन, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दलची (सीएए) तीव्र नाराजी अशा अनेक अडचणींशी झुंजत भाजपने स्वतःचा उत्तर भारतापासून ते दक्षिण भारत, ईशान्य भारतापर्यंत मोठा विस्तार केला आहे. सध्यापेक्षा २०१८मध्ये स्थिती आणखी उत्तम होती. त्यावेळी २१ राज्यांमध्ये भाजप सत्ताधीश होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा