शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 14:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं. 

कोलकाता- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं. आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचं नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही, हे देशाचं दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.बांगलादेशातून आलेल्या मटुआ समुदायातील जनतेला उद्देशून मोदी म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे तुकडे करण्यात आले. सांप्रदायिक दंग्यांमुळे लोकांवर अत्याचार झाले. बांगलादेश आणि पाकिस्तानातून लोकांना पळून आश्रयासाठी भारतात यावं लागलं. आम्ही नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. संसदेत हा कायदा मंजूर होऊ द्यात, त्यामुळे जनतेला त्यांचा अधिकार मिळेल, असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे. आपल्या देशात अनेकदा शेतकऱ्यांबरोबर कर्जमाफीचं राजकारण खेळलं जातं. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत होता, ते काही वर्षांनंतर पुन्हा कर्जबाजारी होत होते.आता राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावे मत मागण्यात आली. ज्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज अद्याप माफ झालेलं नाही आणि ज्याचं झालंय त्यांना फक्त 13 रुपयेच मिळाले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या या घटना आहेत.आमचं सरकार शेतकऱ्यांचं जीवन आनंदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे एक सुरुवात आहे. जेव्हा नवं सरकार बनवल्यानतंर पूर्ण अर्थसंकल्प येईल, तेव्हा शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी आम्ही काय उपाययोजना केल्यात याचं चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी