शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

३९ दिवसांच्या चिमुकलीच्या अवयवदानाने भारावले मोदी; ‘मन की बात’मध्ये केले पालकांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:20 IST

देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे.

नवी दिल्ली : अवयवदान हे ईश्वराचे रूप असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या ९९ व्या भागात सांगितले की, आज देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ३९ दिवसांच्या अबाबत या चिमुकलीच्या अवयवदानाचा उल्लेख केला. 

ऑल इंडिया रेडिओच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये अवयवदान करणाऱ्या चंडीगड येथील चिमुकल्या अबाबतचे पालक सुखबीर सिंग संधू, सुप्रीत कौर आणि झारखंडच्या सरायकेला येथील स्नेहलता यांचा मुलगा अभिजित चौधरी यांच्याशी पंतप्रधानांनी अवयवदानाच्या अनुभवांबद्दल चर्चा केली. मोदी म्हणाले, ‘राज्यांच्या अधिवास स्थापनेची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता रुग्णाला देशातील कोणत्याही राज्यात जाऊन अवयवदानासाठी नोंदणी करता येणार आहे. अवयवदानासाठी ६५ वर्षांखालील वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णयही घेतला आहे.’

चिमुकली मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी 

अबाबतची कहाणी सांगताना पंतप्रधान म्हणाले की, ती केवळ ३९ दिवसांची असताना तिने हे जग सोडले, परंतु तिच्या पालकांनी मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे कौतुक करताना पंतप्रधान त्यांना म्हणाले, ‘तुमची मुलगी मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी बनली आहे. शरीराच्या एका अंशाच्या रूपाने ती आजही उपस्थित आहे.’ याच क्रमाने, पंतप्रधानांनी वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय, किडनी आणि यकृतदान करणाऱ्या स्नेहलता चौधरी यांच्या मुलाशी चर्चा केली. 

मोदी म्हणाले...

सर्व महिला भारताला आणि भारताच्या स्वप्नाला ऊर्जा देत आहेत, स्त्री शक्तीची ही ऊर्जा विकसित भारताचे जीवन आहे.n आज सौरऊर्जेच्या क्षेत्रात देश ज्या वेगाने पुढे जात आहे, ती स्वतःमध्ये एक अनोखी घटना आहे. मोठी उपलब्धी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात