शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर'; नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 09:29 IST

Gandhi jayanti: आज २ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे.

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधींच्या १५४व्या जयंतीनिमित्त राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, गांधी जयंतीच्या खास दिनानिमित्त मी महात्मा गांधींना अभिवादन करतो. त्यांच्या काळातीत शिकवणीमुळे आमचा मार्गातील अंधार दूर झाला. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे, जो सर्व मानवजातीला एकता आणि करुणेच्या भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. एकता आणि सुसंवाद वाढण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. त्यांचे विचार प्रत्येक तरुणातील बदलासाठी सक्षम आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचाराचा अवलंब केला नाही, तर सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून विजय संपादन केला. भारतातील आणि परदेशातील लोक आजही त्यांच्या या तत्त्वाचे पालन करतात. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी