शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जनतेला मान खाली झुकवावी लागेल असं ८ वर्षांत काही केलं नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 12:28 IST

२६ मे रोजी केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली.

केंद्रातील एनडीए सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीचं ८ वर्षे पूर्ण केली. २६ मे रोजी या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये जनतेला संबोधित केलं. गेल्या आठ वर्षांमध्ये आपण असं काहीही केलं नाही, ज्यामुळे मान खाली झुकवावी लागली, असं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी राजकोटमधील अटकोट येथील मातुश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं उद्धाटन केलं.

“२६ मे रोजी एनडीए सरकारनं आपली आठ वर्षे पूर्ण केली. यादरम्यान आपल्या सरकारनं असं कोणतंही काम केलं नाही, ज्यामुळे जनतेला मान खाली घालावी लागली. ६ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गरीबांसाठीही ३ कोटी घरांची निर्मिती केली गेली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले,” असं मोदी म्हणाले. जेव्हा कोरोना महासाथीच्यादरम्यान उपचाराची गरज वाढली तेव्हा आम्ही चाचण्या जलदगतीनं वाढवल्या. जेव्हा लसीकरणाची गरज भासली तेव्हा लसीही मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचं मोदी म्हणाले. “भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार राष्ट्रसेवेची आठ वर्षे पूर्ण करत आहेत. सबका साथ सबका विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न यावर आम्ही देशाच्या विकासाला गती दिली आहे. आमचं सरकार सर्व सुविधा शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम चालवत आहे. जेव्हा प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहोचवण्याचं लक्ष्य असतं तेव्हा भेदभाव संपतो आणि भ्रष्टाचारालाही थारा मिळत नाही,” असं ते म्हणाले.… तर अन्न भंडारं उघडली“गरीबांचं सरकार असेल तर ते त्यांची कशी सेवा करतं, त्यांना सक्षम बनवण्यास कसं काम करतं हे आज देश पाहत आहे. १०० वर्षांच्या मोठ्या संकट काळातही देशानं याचा अनुभव घेतला आह. महासाथीच्या सुरुवातीला अन्नाची समस्या निर्माण झाली. तेव्हा देशानं अन्नाची भंडारं खुली केली. आपल्या मात भगिनी सन्मानानं जगू शकाव्या यासाठी त्यांची जनधन खाती उघडण्यात आली. त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाऊ लागली. शेतकरी आणि मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले. घरातील स्वयंपाकघर सुरू राहावं यासाठी आम्ही मोफत सिलिंडरचीही व्यवस्था केली,” असं ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात