शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Manipur Violence : "49 दिवसांपासून मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान मोदी काहीही न बोलता परदेशात जाताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 15:40 IST

Manipur Violence : मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

मणिपूरमध्ये सुमारे दीड महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, 'मणिपूरमध्ये शेकडो लोक मारले गेले आहेत, हजारो लोक बेघर झाले आहेत, असंख्य चर्च आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता मिझोराममध्येही हिंसाचार पसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरचे नेते या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ मागत आहेत. प्रत्येक दिवस असा विश्वास देत आहे की तोडगा काढण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि भाजप संघर्ष लांबवण्यात मग्न आहेत.

पंतप्रधान मोदींना प्रश्न करत केसी वेणुगोपाल म्हणाले की, विश्वगुरु पंतप्रधान मोदी मणिपूरचं कधी ऐकणार? शांततेचे साधे आवाहनही ते राष्ट्राला कधी करणार? एवढेच नाही तर शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांकडून कधी उत्तर मागणार? असा सवालही त्यांनी केला. याआधीही केसी वेणुगोपाल यांनी मणिपूर हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले होते.

ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी पूर्ण मौन पाळले आहे. त्यांच्या सरकारने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. केंद्र सरकार हे का सुरू ठेवत आहे? या भीषण परिस्थितीला जबाबदार कोण? यासोबतच ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे कारण देश उत्तरे मागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस