शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Manipur Violence : "49 दिवसांपासून मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान मोदी काहीही न बोलता परदेशात जाताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 15:40 IST

Manipur Violence : मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

मणिपूरमध्ये सुमारे दीड महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, 'मणिपूरमध्ये शेकडो लोक मारले गेले आहेत, हजारो लोक बेघर झाले आहेत, असंख्य चर्च आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता मिझोराममध्येही हिंसाचार पसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरचे नेते या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ मागत आहेत. प्रत्येक दिवस असा विश्वास देत आहे की तोडगा काढण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि भाजप संघर्ष लांबवण्यात मग्न आहेत.

पंतप्रधान मोदींना प्रश्न करत केसी वेणुगोपाल म्हणाले की, विश्वगुरु पंतप्रधान मोदी मणिपूरचं कधी ऐकणार? शांततेचे साधे आवाहनही ते राष्ट्राला कधी करणार? एवढेच नाही तर शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांकडून कधी उत्तर मागणार? असा सवालही त्यांनी केला. याआधीही केसी वेणुगोपाल यांनी मणिपूर हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले होते.

ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी पूर्ण मौन पाळले आहे. त्यांच्या सरकारने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. केंद्र सरकार हे का सुरू ठेवत आहे? या भीषण परिस्थितीला जबाबदार कोण? यासोबतच ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे कारण देश उत्तरे मागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस