शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात व्यत्यय; राहुल गांधी म्हणाले, 'Teleprompter भी झूठ नहीं झेल पाया' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 10:51 IST

World Economic Forum : कोरोना संकट काळात जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) दावोस अजेंडा बैठकीत सहभागी झाले होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची क्लिप शेअर करत काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यासोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

कोरोना संकट काळात जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. यावेळी अचानक नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावे लागले. यावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. टेलिप्रॉम्प्टर  (Teleprompter) थांबल्यामुळे पंतप्रधान पुढे बोलले नाहीत, असा आरोप केला जात आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'टेलिप्रॉम्पटर सुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही.' दुसरीकडे, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 'हमे तो टेलिप्रॉम्पटरने लूटा, अपनो में कहा दम था', असे म्हणत नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.  

दुसरीकडे, भाजपा नेत्यांकडूनही काँग्रेसवर पलटवार करण्यात आला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी म्हटले आहे की, जागतिक आर्थिक परिषदेकडून तांत्रिक त्रुटी आली होती, त्यामुळे पंतप्रधानांनी भाषण थांबवले.

दरम्यान, असे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की टेलिप्रॉम्प्टरमध्ये दोष आलेला नाही, तर व्यवस्थापकीय टीमने पंतप्रधानांना थांबण्यास सांगितले होते आणि प्रत्येकजण त्यांचा आवाज ऐकत आहे की नाही हे विचारले होते.

जागतिक आर्थिक परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशात झालेले 10 मोठे बदल सांगितले आणि आता कठीण काळ संपल्याचे सांगितले. तसेच, भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे सांगत त्यांनी गुंतवणुकदारांना आवाहनही केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस