शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

PM मोदी लवकरच २ कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत?; लाल किल्ल्यावरील भाषणातून दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 11:57 IST

आगामी काळात केंद्र सरकारकडून आणखी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

PM Narendra Modi Speech ( Marathi News ) :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून देशातील विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसंच आगामी काळात केंद्र सरकारकडून आणखी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत. यामध्ये समान नागरी कायद्यासह वन नेशन, वन इलेक्शन यांसारख्या निर्णयाचा समावेश असू शकतो. 

देशभरातील निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या निर्णयाचे संकेत देताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "आपल्या देशात एखादी योजना राबवत असताना त्याचा संबंध निवडणुकांशी जोडला जातो. निवडणूक जवळ आल्यानेच योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता वन नेशन, वन इलेक्शनबाबत व्यापक चर्चा होऊ लागली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले असून एका समितीनेही याबाबतचा अहवाल मांडला आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाने वन नेशन, वन इलेक्शनसाठी पुढे आलं पाहिजे," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

समान नागरी कायद्याचाही विचार होणार?

देशात मागील अनेक वर्षांपासून समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होते. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. "आपल्या देशात मागील ७५ वर्षांपासून कम्युनिल सिव्हिल कोड आहे. यामध्ये आता बदल झाला पाहिजे. आपण सेक्युलर सिव्हिल कोडच्या दिशेने जायला पाहिजे. ज्यामुळे आगामी काळात देशाला धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावापासून मुक्ती मिळेल," असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, "जाती-पातीच्या वरती जाऊन प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जातो, तेव्हा देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचं दिसतं. मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्तम जीवन जगण्याची अपेक्षा असते. मी एक स्वप्न पाहिले आहे की, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला, तर त्याचा एक घटक असा असेल की, सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. ससरकारमुळे कोणताही त्रास, अडथळा निर्माण होऊ नये. परंतु सरकारची गरज भासल्यास प्रशासन मदतीला उपलब्ध असेल," असंही त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी सांगितला देशवासियांच्या स्वप्नातील भारत

देशवासीयांना आपला भारत कसा असावा, याबाबत नेमके काय वाटते, याची एक यादीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात वाचून दाखवली. विकसित भारतासाठी सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. हजारो देशवासीयांनी सल्ला, सूचना सरकारला पाठवल्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि यादी वाचून दाखवली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndependence Dayस्वातंत्र्य दिन