शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 22:38 IST

असदुद्दीन ओवेसी शुक्रवारी (२ मे २०२५) माध्यमांशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने म्हणत असतात की, ते मागास जातींचे नेते आहेत, तर मग...

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नुकताच देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर, वरोधी पक्ष आपली पाठ थोपटून घेत आहेत. राहुल गांधी सरकारच्या या निर्णयाचे श्रेय स्वतःलाच देऊन घेत आहेत. यातच आता AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी शुक्रवारी (२ मे २०२५) माध्यमांशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने म्हणत असतात की, ते मागास जातींचे नेते आहेत, तर मग ते संसदेत आरक्षणासंदर्भात विधेयक का आणत नाहीत? आपण विधेयक आणून 50 टक्के आरक्षणाची सीमा संपुष्टात आणा. 

यावेळी ओवेसी प्रश्न उपस्थित करत म्हणाले, आपण जनगणना केव्हा सुरू करणार? 2029 लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण होऊ शकेल का? आरक्षण विधेयकाला समर्थनासंदर्भात विचारले असता ओवेसी म्हणाले, आपण (मोदी सरकार) संसदेत विधेयक आणा, पंतप्रधानांना कोण रोखत आहे? तत्काळ विधेयक आणा.

काय म्हणाले राहुल गांधी? -विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणना डिझाइन करण्यासाठी आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. आपल्याकडे बिहार आणि तेलंगणाची उदाहरणे आहेत, ज्यात प्रचंड तफावत आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना कशा पद्धतीने होणार हे स्पष्ट करावे. तसेच ती केव्हा होणार, याची तारीखही जाहीर करावी.

काय म्हणाले अखिलेश यादव?समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव म्हणाले, जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा 90 टक्के पीडीएच्या एकतेचा 100 टक्के विजय आहे. आपल्या सर्वांच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा