शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:35 IST

PM Narendra Modi: निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे मोदींनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेटकर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळइतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश दौरा केला. सिद्धार्थनगर आणि वाराणसी येथील विविध विकासकामे तसेच २ हजार ३२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक केले. योगी सरकार संवेदनशील असून, हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे सांगत निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे म्हटले आहे. 

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. उत्तर प्रदेशातूनच देशासाठी मोठी आरोग्य योजना सुरू होत असून, या मोठ्या कामासाठी तुमचा आशिर्वाद घेऊन काशीला जाणार आहे. केंद्र आणि यूपीतील सरकारमधील कर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे. सिद्धार्थनगरने स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी यांच्या रूपाने एक समर्पित लोकप्रतिनिधी दिला, ज्यांच्या अथक परिश्रमाचा राष्ट्रासाठी उपयोग होत आहे. सिद्धार्थनगरच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माधव प्रसाद त्रिपाठी नावावर ठेवणे ही त्यांच्या सेवेला खरी श्रद्धांजली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले

उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की, योगींनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. तेव्हा योगीजी मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आता लोकं पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का, असा खोचक सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या आधीच्या सरकारने आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये बांधली होती. योगींच्या कार्यकाळात १६ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून, ३० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांवर वेगाने काम सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी