शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:35 IST

PM Narendra Modi: निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे मोदींनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेटकर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळइतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश दौरा केला. सिद्धार्थनगर आणि वाराणसी येथील विविध विकासकामे तसेच २ हजार ३२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक केले. योगी सरकार संवेदनशील असून, हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे सांगत निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे म्हटले आहे. 

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. उत्तर प्रदेशातूनच देशासाठी मोठी आरोग्य योजना सुरू होत असून, या मोठ्या कामासाठी तुमचा आशिर्वाद घेऊन काशीला जाणार आहे. केंद्र आणि यूपीतील सरकारमधील कर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे. सिद्धार्थनगरने स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी यांच्या रूपाने एक समर्पित लोकप्रतिनिधी दिला, ज्यांच्या अथक परिश्रमाचा राष्ट्रासाठी उपयोग होत आहे. सिद्धार्थनगरच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माधव प्रसाद त्रिपाठी नावावर ठेवणे ही त्यांच्या सेवेला खरी श्रद्धांजली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले

उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की, योगींनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. तेव्हा योगीजी मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आता लोकं पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का, असा खोचक सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या आधीच्या सरकारने आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये बांधली होती. योगींच्या कार्यकाळात १६ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून, ३० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांवर वेगाने काम सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी