शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:35 IST

PM Narendra Modi: निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे मोदींनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेटकर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळइतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश दौरा केला. सिद्धार्थनगर आणि वाराणसी येथील विविध विकासकामे तसेच २ हजार ३२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक केले. योगी सरकार संवेदनशील असून, हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे सांगत निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे म्हटले आहे. 

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. उत्तर प्रदेशातूनच देशासाठी मोठी आरोग्य योजना सुरू होत असून, या मोठ्या कामासाठी तुमचा आशिर्वाद घेऊन काशीला जाणार आहे. केंद्र आणि यूपीतील सरकारमधील कर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे. सिद्धार्थनगरने स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी यांच्या रूपाने एक समर्पित लोकप्रतिनिधी दिला, ज्यांच्या अथक परिश्रमाचा राष्ट्रासाठी उपयोग होत आहे. सिद्धार्थनगरच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माधव प्रसाद त्रिपाठी नावावर ठेवणे ही त्यांच्या सेवेला खरी श्रद्धांजली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले

उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की, योगींनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. तेव्हा योगीजी मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आता लोकं पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का, असा खोचक सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या आधीच्या सरकारने आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये बांधली होती. योगींच्या कार्यकाळात १६ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून, ३० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांवर वेगाने काम सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी