शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
3
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
4
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
5
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
6
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
7
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
8
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
9
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
10
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
11
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
12
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
13
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
14
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
15
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
16
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
17
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
18
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
19
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
20
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 05:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त भारतीयांंना उद्देशून खुले पत्र लिहिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरतो हे त्यांनी अभिमानाने सांगावे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त जनतेला मंगळवारी दिला. त्यांनी नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा नारा अधिक बुलंद करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदी यांनी म्हटले आहे की, आज जग विविध संकटांनी ग्रासले असताना भारत स्थैर्याचे प्रतीक म्हणून उदयास आला आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरात घट करण्याचा निर्णय हे आमच्या सरकारचे ऐतिहासिक यश आहे. ‘जीएसटी बचत उत्सव’दरम्यान नागरिक हजारो कोटी रुपयांची बचत करत आहेत. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे, सर्व भाषांचा आदर करण्याचे, स्वच्छतेचे पालन करण्याचे, योगासने करण्याचे, आहारातील तेलाचे प्रमाण १० टक्के कमी करण्याचे, आरोग्याला प्राधान्य देण्याचे पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले. 

या गोष्टींचा स्वीकार केल्याने आपण लवकरच विकसित भारत घडविण्याच्या दिशेने झपाट्याने पुढे जाऊ, असे त्यांनी सांगितले. जसे दिवे एकमेकांना प्रकाशित करतात. त्याच भावनेने समाजात सकारात्मकतेचे दिवे लावूया अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

ऑपरेशन सिंदूर’द्वारे अन्यायाचा सूड घेतला

भगवान श्रीराम आपल्याला धर्माचं पालन करण्याची शिकवण देतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्यही प्रदान करतात. त्याचे जिवंत उदाहरण आपल्याला काही महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाहायला मिळाले. या लष्करी कारवाईमध्ये भारताने केवळ धर्माचे पालन केले नाही, तर अन्यायाचाही सूड घेतला, असे पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीनिमित्त लिहिलेल्या खुल्या पत्रात मंगळवारी म्हटले आहे.

नक्षलवादमुक्त जिल्ह्यांत  दिवाळीचा मोठा जल्लोष

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद समूळ नष्ट झाला आहे, अशा ठिकाणीही यंदा जल्लोषात दिवाळी साजरी होत आहे. हे या वर्षाचे खास वैशिष्ट्ये आहे. गेल्या काही कालावधीत अनेक लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे.

आपल्या संविधानावर विश्वास दाखवला आहे. ही देशासाठी खूप महत्त्वाची घटना आहे. मोदी यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मी आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या नौदलाच्या विमानवाहू जहाजावर नौदल सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.  

‘देशातील स्थैर्यामुळे प्रगतीला चालना’ 

जगावर अनेक संकटे येत आली. पण, भारताने आपली प्रगती सुरूच ठेवली. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. देशातील स्थैर्यामुळे ही गोष्ट शक्य होणार आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's call for self-reliance; letter urges 'Ek Bharat, Shreshtha Bharat'.

Web Summary : PM Modi urged citizens to use indigenous goods, fostering 'Ek Bharat, Shreshtha Bharat'. He highlighted GST savings, cleanliness, yoga, and reduced oil consumption. Modi celebrated Diwali with naval officers on INS Vikrant, emphasizing India's stability amid global crises and its journey to become the third-largest economy.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरGSTजीएसटीMake In Indiaमेक इन इंडिया