शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

PM Modi Mann Ki Baat: भारतात तयार झालेल्या वस्तूंना जगभरात मागणी, निर्यातीतही ऐतिहासिक वाढ; पंतप्रधानांनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:19 IST

भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. पाचा राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. "भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे," असं ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असल्याचंही सांगितलं. "आज संपूर्ण जगात योग आणि आयुर्वेदाप्रती कल वाढत आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका योग कार्यक्रमात ११४ देशांच्या नागरिकांनी भाग घेत एक जागतिक विक्रम स्थापन केला. आयुष उद्योगाची बाजारपेठ सतत विस्तारत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ २२ हजार कोटींच्या आसपास होती. आज आयुष उत्पादन उद्योग सुमारे एक लाख ४० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे," असंही ते म्हणाले."अमृत सरोबत बांधले जाऊ शकतात"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ अमृत सरोवर बांधले जाऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काही जुन्या तलावांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, काही नवीन बांधले जाऊ शकतात. या दिशेने तुम्ही नक्कीच काही प्रयत्न कराल याची मला खात्री आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

जलसंधारणावर भरआपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी जलसंधारणावर भर दिला. "मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या विहिरींना (Stepwells) वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी संरक्षणासाठी 'जल मंदिर योजने'ने मोठी भूमिका बजावली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये अनेक विहिरंचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यामुळे या भागातील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली. तुम्ही स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारच्या मोहिमा चालवू शकता. देशातील अनेकांनी जलसंधारण हाच जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे, याचा मला आनंद आहे," असंही मोदी म्हणाले.

निर्यात ४०० अब्ज डॉलर्सवरएकेकाळी भारतातून निर्यातीचा आकडा १०० अब्ज, कधी १५० अब्ज होता, आज भारत ४०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतात तयार उत्पादनांची मागणी जगभरात वाढत आहे असा याचा अर्थ आहे. दुसरे म्हणजे भारताची पुरवठा साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पूर्वी असं मानलं जात होतं की केवळ मोठे लोकच सरकारला उत्पादनं विकू शकतात, परंतु सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलनं हे चित्र बदलले आहे. त्यातून नव्या भारताची भावना दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.बाबा शिवानंद यांचा उल्लेखकार्यक्रमात मोदींनी बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिलं असेल, असं मोदी म्हणाले. १२६ वर्षे वय असतानाही त्यांची चपळता पाहून माझ्या प्रमाणेच सर्वांनाच आश्चर्य वाटले असेल आणि काही सेकंदातच ते नंदीमुद्रेत प्रणाम करू लागले. मी पण बाबा शिवानंदजींना नतमस्तक झालो, असंही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत