शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जलसंवर्धनासाठी मोदींची अनोखी शक्कल; देशातील सरपंचाना पाठवले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 11:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना मोदींचे पत्र मिळाले आहे. खुद्द मोदींचे पत्र येणे हा ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली - पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील कामाला सुरुवात केली आहे. यावेळी मोदी सरकार जलसंवर्धनावर भर देताना दिसून येत आहे. त्यासाठी मोदींनी एक अनोखी शक्कल लढवली असून त्यांनी देशातील सर्व गावांच्या सरपंचांना पत्र पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामपंचायतीचे सरंपच आणि प्रमुखांना वैयक्तीकरित्या पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये मोदींनी यंदाच्या मान्सूनच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट टळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी असलेले हे पत्र जिल्ह्याचे कलेक्टर सरपंचांना किंवा त्या गावच्या प्रमुखांना देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना मोदींचे पत्र मिळाले आहे. खुद्द मोदींचे पत्र येणे हा ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रात जास्तीत जास्त लोकांना पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना मोदींनी सरपंचांना केल्या आहेत.

मोदींनी पत्रात म्हटले की, प्रिय सरपंचजी नमस्कार. आता मान्सूनचे लवकरच आगमण होणार आहे. आपण नशीबवान आहोत की, देव आपल्याला पावसाच्या रुपाने मोठ्या प्रमाणात पाणी देतो. आपण सगळ्यांनी मिळून या पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, गावातील लोकांशी जलसंवर्धनासंदर्भात चर्चा करावी. मला विश्वास आहे की, तुम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवाल, असंही मोदींनी पत्रात नमूद केले आहे.