शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:19 IST

"धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि निवडणुकीला सामोरे जायचं, हाच भाजपचा अजेंडा"

Sanjay Raut vs Pm Narendra Modi BJP Govt: अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारणीचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी २०२४ ला राम मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. काही दिवसांपूर्वी, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या मानसिकेतवर घणाघाती प्रहार केला होता. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी भाजपा सरकारकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर विधान केले आहे.

"जो राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवून आणू शकतो असे बोलले जाते किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्याचा वापर करतो, त्या लोकांबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. काश्मीरचे माजी राज्यपाल पुलवामा हल्ला घडवून आणला असं सांगत होते. गुजरात दंगलीबाबतही असाच काहीसा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे लोकांच्यात भीती निर्माण करण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही असं काही तरी घडवलं जाऊ शकतं. अयोध्येला मोठ्या संख्येने लोकांना बोलवण्यात येईल, विशेष रेल्वे सोडल्या जातील आणि त्यांच्यावर प्लॅनिंग करून दगडफेक केली जाऊ शकेल, त्यातूनच देशभर दंगडी भडकवल्या जाऊ शकतील अशी भिती किंवा अंदाज लोक व्यक्त करत आहेत," असे खळबळजनक विधान राऊतांनी केले.

'जायेगा तो मोदी'

“बाबरी अयोध्येचा मुद्दा आता संपलेला आहे. हा मुद्दा काढणारे मूर्ख आहेत. येत्या २०२४च्या निवडणुकीत 'आयेगा तो मोदी' नाही, 'जायेगा तो मोदी' अशी घोषणा दिली जाईल. लोकसभेमध्ये आमचा 19चा आकडा कायम राहील. उलट आणखी जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे. भाजपाकडे 2024च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही. म्हणूनच मूळ प्रश्नांना बगल देऊन धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं, हा एकच अजेंडा भाजपकडे आहे", असेही संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीच जिंकणार!

'इंडिया' आघाडीला कोणी काउंटर करू शकत नाही. आमची घोडदौड रोखणं कोणालाही शक्य नाही. कोणी कितीही आडवे आले, तरी ते करू शकणार नाही. येत्या निवडणुकीत इंडियाच जिंकेल. देशातील वातावरण आता बदलू लागले आहे. त्यामुळे आता भाजपा पराभव करून इंडिया आघाडीच विजयश्री मिळवेल," असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा