शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

गादीऐवजी चटईवर झोपणं, जेवणाऐवजी केवळ फलाहार...; प्राणप्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदींचा कठोर तप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:07 IST

पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

नवी दिल्ली - येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. भारतातला हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीच्या आधी ११ दिवस विशेष धार्मिक विधीची सुरुवात केली आहे. या ११ दिवसांत पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत. त्यात धावपळीच्या दिनक्रमातही पंतप्रधान मोदी या खास विधींच्या नियमांचे कठोर पालन करताना दिसत आहेत. 

माहितीनुसार, ११ दिवसांच्या या कालावधीत पंतप्रधान मोदी केवळ नारळ पाणी पित आहेत. त्याचसोबत जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. पंतप्रधान या काळात केवळ फलाहार आणि दूधापासून बनलेल्या गोष्टी खाऊ शकतात. त्यांना जमिनीवर झोपावे लागणार आहे असं राम मंदिराचे पुजाऱ्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. १२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

जमिनीवर झोपण्याचे फायदे काय?

आयुर्वेदानुसार, जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर झोपल्याने माणसाला श्वासोच्छवास सुलभ होतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जमिनीवर झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. शरीराची मुद्राही योग्य राहते. जे जमिनीवर झोपतात त्यांना पाठदुखीसारखी समस्या होत नाही. तथापि, जेव्हा तुम्ही उशीशिवाय झोपता तेव्हा जमिनीवर झोपण्याचे फायदे जास्त असतात असं आयुर्वेदाचे डॉक्टर भारत भूषण यांनी सांगितले. 

तर थंडीच्या काळात अनेक लोक नारळ पाणी पित नाहीत. परंतु या काळात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. कारण त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, सोडियम आणि इतर अनेक घटक असतात. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे ते प्यायल्याने शरीरात हायड्रेशनची कमतरता होत नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायचे असेल तर ते दुपारी प्या. वातावरण थंड असलं तरी अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने कोणतीही हानी होत नाही असं आयुर्वेदात सांगितले आहे. परंतु जर एखाद्याला सर्दी-खोकला होत असेल तर त्याने डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करावे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी