शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

गादीऐवजी चटईवर झोपणं, जेवणाऐवजी केवळ फलाहार...; प्राणप्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदींचा कठोर तप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:07 IST

पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

नवी दिल्ली - येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. भारतातला हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीच्या आधी ११ दिवस विशेष धार्मिक विधीची सुरुवात केली आहे. या ११ दिवसांत पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत. त्यात धावपळीच्या दिनक्रमातही पंतप्रधान मोदी या खास विधींच्या नियमांचे कठोर पालन करताना दिसत आहेत. 

माहितीनुसार, ११ दिवसांच्या या कालावधीत पंतप्रधान मोदी केवळ नारळ पाणी पित आहेत. त्याचसोबत जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. पंतप्रधान या काळात केवळ फलाहार आणि दूधापासून बनलेल्या गोष्टी खाऊ शकतात. त्यांना जमिनीवर झोपावे लागणार आहे असं राम मंदिराचे पुजाऱ्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. १२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

जमिनीवर झोपण्याचे फायदे काय?

आयुर्वेदानुसार, जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर झोपल्याने माणसाला श्वासोच्छवास सुलभ होतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जमिनीवर झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. शरीराची मुद्राही योग्य राहते. जे जमिनीवर झोपतात त्यांना पाठदुखीसारखी समस्या होत नाही. तथापि, जेव्हा तुम्ही उशीशिवाय झोपता तेव्हा जमिनीवर झोपण्याचे फायदे जास्त असतात असं आयुर्वेदाचे डॉक्टर भारत भूषण यांनी सांगितले. 

तर थंडीच्या काळात अनेक लोक नारळ पाणी पित नाहीत. परंतु या काळात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. कारण त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, सोडियम आणि इतर अनेक घटक असतात. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे ते प्यायल्याने शरीरात हायड्रेशनची कमतरता होत नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायचे असेल तर ते दुपारी प्या. वातावरण थंड असलं तरी अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने कोणतीही हानी होत नाही असं आयुर्वेदात सांगितले आहे. परंतु जर एखाद्याला सर्दी-खोकला होत असेल तर त्याने डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करावे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी