शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

गादीऐवजी चटईवर झोपणं, जेवणाऐवजी केवळ फलाहार...; प्राणप्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदींचा कठोर तप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:07 IST

पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

नवी दिल्ली - येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. भारतातला हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीच्या आधी ११ दिवस विशेष धार्मिक विधीची सुरुवात केली आहे. या ११ दिवसांत पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत. त्यात धावपळीच्या दिनक्रमातही पंतप्रधान मोदी या खास विधींच्या नियमांचे कठोर पालन करताना दिसत आहेत. 

माहितीनुसार, ११ दिवसांच्या या कालावधीत पंतप्रधान मोदी केवळ नारळ पाणी पित आहेत. त्याचसोबत जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. पंतप्रधान या काळात केवळ फलाहार आणि दूधापासून बनलेल्या गोष्टी खाऊ शकतात. त्यांना जमिनीवर झोपावे लागणार आहे असं राम मंदिराचे पुजाऱ्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. १२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

जमिनीवर झोपण्याचे फायदे काय?

आयुर्वेदानुसार, जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर झोपल्याने माणसाला श्वासोच्छवास सुलभ होतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जमिनीवर झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. शरीराची मुद्राही योग्य राहते. जे जमिनीवर झोपतात त्यांना पाठदुखीसारखी समस्या होत नाही. तथापि, जेव्हा तुम्ही उशीशिवाय झोपता तेव्हा जमिनीवर झोपण्याचे फायदे जास्त असतात असं आयुर्वेदाचे डॉक्टर भारत भूषण यांनी सांगितले. 

तर थंडीच्या काळात अनेक लोक नारळ पाणी पित नाहीत. परंतु या काळात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. कारण त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, सोडियम आणि इतर अनेक घटक असतात. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे ते प्यायल्याने शरीरात हायड्रेशनची कमतरता होत नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायचे असेल तर ते दुपारी प्या. वातावरण थंड असलं तरी अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने कोणतीही हानी होत नाही असं आयुर्वेदात सांगितले आहे. परंतु जर एखाद्याला सर्दी-खोकला होत असेल तर त्याने डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करावे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी