शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

गादीऐवजी चटईवर झोपणं, जेवणाऐवजी केवळ फलाहार...; प्राणप्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदींचा कठोर तप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:07 IST

पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

नवी दिल्ली - येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. भारतातला हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीच्या आधी ११ दिवस विशेष धार्मिक विधीची सुरुवात केली आहे. या ११ दिवसांत पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत. त्यात धावपळीच्या दिनक्रमातही पंतप्रधान मोदी या खास विधींच्या नियमांचे कठोर पालन करताना दिसत आहेत. 

माहितीनुसार, ११ दिवसांच्या या कालावधीत पंतप्रधान मोदी केवळ नारळ पाणी पित आहेत. त्याचसोबत जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. पंतप्रधान या काळात केवळ फलाहार आणि दूधापासून बनलेल्या गोष्टी खाऊ शकतात. त्यांना जमिनीवर झोपावे लागणार आहे असं राम मंदिराचे पुजाऱ्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. १२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले. 

जमिनीवर झोपण्याचे फायदे काय?

आयुर्वेदानुसार, जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर झोपल्याने माणसाला श्वासोच्छवास सुलभ होतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जमिनीवर झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. शरीराची मुद्राही योग्य राहते. जे जमिनीवर झोपतात त्यांना पाठदुखीसारखी समस्या होत नाही. तथापि, जेव्हा तुम्ही उशीशिवाय झोपता तेव्हा जमिनीवर झोपण्याचे फायदे जास्त असतात असं आयुर्वेदाचे डॉक्टर भारत भूषण यांनी सांगितले. 

तर थंडीच्या काळात अनेक लोक नारळ पाणी पित नाहीत. परंतु या काळात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. कारण त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, सोडियम आणि इतर अनेक घटक असतात. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे ते प्यायल्याने शरीरात हायड्रेशनची कमतरता होत नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायचे असेल तर ते दुपारी प्या. वातावरण थंड असलं तरी अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने कोणतीही हानी होत नाही असं आयुर्वेदात सांगितले आहे. परंतु जर एखाद्याला सर्दी-खोकला होत असेल तर त्याने डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करावे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी