शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, "नवा भारत कमाल करत आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:17 IST

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करून त्यांचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केले. या रोजगार मेळाव्यात नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. देशभरात ४६ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे. भारतात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नवा भारत कमाल करत आहे."

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सरकारी सेवांसाठी आज नियुक्ती पत्र मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तुम्हा सर्वांनी अथक परिश्रमानंतर हे यश मिळवले आहे. लाखो उमेदवारांमधून तुमची निवड झाली आहे, असे नरेंद्र  मोदी म्हणाले.

गेल्या ९ वर्षांत आमच्या योजनांनी आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आमची धोरणे नवीन मानसिकता, सामग्री निरीक्षण, मिशन मोड अंमलबजावणी आणि लोकसहभागावर आधारित आहेत. ९ वर्षात सरकारने मिशन मोडवर धोरणे लागू केली आहेत, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, ''मित्रांनो, देशाच्या विकासाच्या प्रवासात तुम्हा सर्वांना थेट सरकारसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, भारताचा संकल्प सार्थकी लावल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन."

याचबरोबर, गेल्या ९ वर्षांत नाविन्यपूर्ण पद्धतीने मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने भ्रष्टाचार कमी होऊन सुविधा वाढल्या आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान,  यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी ८ व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी ५१ हजार १०६ तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. या रोजगार मेळाव्यात नियुक्त करण्यात येणारे नवीन कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आपली सेवा देतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी