शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Delhi Election 2020 : शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 20:50 IST

केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे.

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या केजरीवालांवर लोकपाल, बाटला हाऊस एन्काऊंटर आणि CAA विरोधात शाहीन बाग सुरू असलेल्या हिंसाचारावरून टीकास्त्र सोडलं आहे. देशाच्या सौहार्दाला खंडित करण्यासाठी ही सर्व कटकारस्थानं सुरू आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. दिल्लीत मोदी सरकार येण्याआधी दहशतवादी हल्ले होत होते, परंतु ते आता थांबले आहेत. गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांनी ठार केल्यावर ते बनावट एन्काऊंटर असल्याचा कांगावा करण्यात आला. शाहीन बागच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेस आणि आपवर हल्लाबोल केला आहे. शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तसेच दिल्लीच्या लोकांना विकासासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे होतं. केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे. दिल्लीतल्या लोकांनी परिवर्तनाचं मन बनवलं असून, सर्वच स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कडकडडुमामध्ये पोहोचले असून, त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं आहे. 

दिल्ली फक्त शहरच नसून त्याला वारसा लाभलेला आहे. दिल्लीनं नेहमीच सर्वांचा सत्कार केलेला असून, सगळ्यांनाच स्वीकारलेलं आहे. फाळणीनंतर आलेल्या किंवा इतर राज्यांतील भारतीयांना दिल्लीनं आपल्या हृदयात सामावून घेतलं आहे. दिल्लीतल्या सातही जागा आम्हाला देऊन दिल्लीचे लोक कोणत्या दिशेनं विचार करतात हे समजलं आहे.देश बदलवण्यात दिल्लीच्या लोकांचं मोठं योगदान आहे. आता मतदार मतांनी दिल्लीसुद्धा बदल घडवणार आहेत. आम्ही संसदेत दिल्लीला अवैधरीत्या कॉलनीच्या समस्यांपासून मोकळं केलं आहे. आता दिल्लीच्या लोकांना सरकारी बुलडोझरला घाबरण्याची गरज नाही. जिथे झोपड्या आहेत, तिथे पक्की घरं देण्यात येणार  आहेत. पक्क्या घरात गॅस कनेक्शन, नळ, पाणी यांसारख्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

भाजप नकारात्मकतेचं नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी आम्ही केलेले संकल्प मोठे आहेत. देशासमोरली शेकडो आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. पण तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक