शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: हनुमंतांप्रमाणे राष्ट्राची सेवा करा; भाजप स्थापनादिनी PM मोदींचे १० लाख कार्यकर्त्यांना संबोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:25 IST

PM Modi Speech On BJP 44th Foundation Day: भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने बघणे आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणे ही आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच दिवशी भाजपचा स्थापना दिवस आहे. भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कार्यकर्त्यांना संबोधित केले. रामभक्त हनुमंतांना नमन करत पंतप्रधान मोदी यांनी हनुमानाप्रमाणे राष्ट्राची सेवा करण्याचे आवाहन केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरात हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हनुमानाचे जीवन आजही प्रेरणादायी ठरत आहे. लक्ष्मणावर संकट आले, तेव्हा हनुमानाने सगळा पर्वत उचलून आणला होता. यातून आपल्याला प्रेरणा मिळते. भाजप लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असते आणि पुढेही करत राहणार, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असेही मोदी म्हणाले. 

भाजप महिलांचे आयुष्य सोपे बनवण्याला प्राथमिकता देते

भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्यांनी पक्षासाठी त्याग केला, पक्षासाठी जीवन झिजवले, पक्ष जोपासला, बळकट केला, समृद्ध केला, छोट्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ पदापर्यंत देशाची आणि पक्षाची सेवा करणाऱ्या सर्व महान व्यक्तींचे मी मनापासून आभार मानतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती महिलांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या आव्हानांची कदर नाही. पण भाजप महिलांचे आयुष्य सोपे बनवण्याला प्राथमिकता देते, असे मोदी म्हणाले. तसेत हे सगळे वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, श्रेयवादाच्या मागे लागला आहे. भाजपाची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन जाणारी आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्ने बघायची आणि त्याहून छोटे यश मिळवून आनंद साजरा करायचा तसेच एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने बघणे आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणे ही आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, १९४७मध्ये इंग्रज निघून गेले. पण जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता इथेच काही लोकांच्या डोक्यात सोडून गेले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये देशात असा वर्ग मोठा झाला, जो सत्तेला आपला जन्मजात हक्क समजत होता. या लोकांच्या बादशाही मानसिकतेने देशाच्या जनतेला नेहमीच आपली गुलाम मानले. २०१४ मध्ये या दबलेल्या, शोषित-वंचित वर्गाने आपला आवाज उठवला. बादशाही मानसिकतेचे लोक या वर्गाचा आवाज ऐकणे तर सोडून द्या, पण पायदळीच तुडवत राहिले. त्यामुळेच आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच बादशाही मानसिकतेच्या लोकांनी शोषित, वंचित, दलित, मागास लोकांची टर उडवण्याची एकही संधी सोडली नाही, अशी टीका मोदींनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी