शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi: “देशासमोर आव्हाने असताना जनतेचा विश्वास भाजपवरच, हे सिद्ध झाले”: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 20:16 IST

PM Narendra Modi: पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

PM Narendra Modi: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून, गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याचे चित्र आहे. यानिमित्ताने दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. या आनंदात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, देशासमोर आव्हाने असतात, तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवरच असतो, हा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

गुजरात, हिमाचल आणि दिल्लीतील नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. जिथे भारतीय जनता पक्ष एकहाती विजयी झाला नाही, तिथे भाजपची मतांची टक्केवारी ही पुरेशी आहे. देशातील विविध राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपप्रती असलेली आपुलकी दिसून येते.उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. भाजपला मिळालेला जनसमर्थन हे नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. भाजपला मिळालेला पाठिंबा हे भारतातील तरुणांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी भाजपला हा जनाधार मिळालेला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

देशासमोर आव्हाने असताना जनतेचा विश्वास भाजपवरच, हे सिद्ध झाले

देशासमोर आव्हाने असतात, तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवरच असतो, हा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले आहे. तरुणांनी आमच्या कामाला तपासून, चाचपणी करून विश्वास दाखवला, हा त्यामागचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आम्ही कल्पनेवरही भर देतो आणि व्यवस्थाही मजबूत करतो. देश समृद्ध असेल तर देशवासी निश्चितपणे समृद्ध होईल, यात शंका नाही, यात शंका नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

दरम्यान, शॉर्टकट राजकारणाचा मोठा फटका देशाला सहन करावा लागणार आहे, हे देशातील मतदार जाणतो. समाजातील अंतर वाढवून, देशापुढे नवी आव्हाने निर्माण करून, तात्कालिक लाभ घेण्यात मग्न असलेले राजकीय पक्षांना देशातील जनता, देशातील तरुण पिढी जवळून अनुभवत आहे. हे सगळे समजून घेत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. तसेच आज जो भाजप दिसत आहे, तो मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहोचलेला आहे. जनसंघापासून लाखों कार्यकर्त्यांनी अनेक त्याग करून पक्ष इथपर्यंत आणला आहे. कार्यकर्त्यांच्या तपस्येमुळे, त्यागामुळेच आजचा भाजप दिसत असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्ली