शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 20:51 IST

Kinjarapu Ram Mohan Naidu : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव खासदार राम मोहन नायडू किंजरापू यांचे आहे.

PM Narendra Modi Oath Ceremony :नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी पंतप्रधान मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात चंद्रमोहन नायडू यांच्या टीडीपी पक्षातून दोन खासदारांना मंत्री करण्यात आले आहेत. चंद्रशेखर पेम्मासानी आणि राम मोहन नायडू किंजरापू यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यातील टीडीपी खासदार राम मोहन हे सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे. खासदार राम मोहन हे केवळ ३६ वर्षांचे असून मोदी ३.० मंत्रिमंडळामधील सर्वात तरुण मंत्री आहेत.

टीडीपीचे खासदार किंजरापू राम मोहन नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. एनडीएमध्ये भाजपनंतर टीडीपी हा  सर्वात मोठा पक्ष आहे, ज्याला १६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे टीडीपीला दोन मंत्रि‍पदे देण्यात आली आहेत. त्यातच आता राम मोहन नायडूंना महत्त्वाचे मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री बनलेले राम मोहन नायडू हे चंद्राबाबू नायडू यांच्या जवळचे मानले जातात. वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदाच विजयी होऊन ते खासदार झाले.

२३ कोटींची संपत्ती

लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राममोहन नायडू यांची एकूण संपत्ती २३.३० कोटी रुपये आहे. तर त्यांच्यावर २ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. राममोहन नायडू यांनीही शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. शेअर्समधील गुंतवणुकीत राममोहन नायडू यांनी १.१० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. राममोहन नायडू यांच्याकडे १.४५ लाख रुपयांची रोकड आहे. तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे २ लाख रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये ३ कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. यासोबतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे ४८ लाख रुपयांच्या एलआयसी पॉलिसी आहेत. राममोहन नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे  अंदाजे १.५१ कोटी रुपयांचे दागिने आहे.

वडिलांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश

राम मोहन नायडू यांनी त्यांच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. वडिलांचे अकाली निधन झाले नसते तर कदाचित राम मोहन नायडू राजकारणात दिसले नसते. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. येथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एमबीए केले. यानंतर राम मोहन नायडू हे सिंगापूरला गेले, जिथे ते वडिलांच्या निधनाच्या बातमीने त्यांना धक्का बसला. नायडू हे २४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर नायडू हे सर्व काही सोडून ते मायदेशी परतले आणि त्यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू