शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

शेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 29, 2020 13:37 IST

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 'नमामी गंगे मिशन'अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही - मोदीजल जीवन मिशनच्या माध्यमातून घरा-घरात शुद्ध पाणी पोहोचवले जाईल - मोदी

 नवी दिल्ली - गंगा स्वच्छता अभियान हा मुद्दा मोदी सरकारच्या कार्यक्रमातील महत्वांच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 'नमामी गंगे मिशन'अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी, जल जीवन मिशनच्या माध्यमातून घरा-घरात शुद्ध पाणी पोहोचवले जाईल. गंगा म्हणजे आपला वारसा आहे. ती देशातील अनेकांना समृद्ध बनवते. यापूर्वीही गंगा स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. मात्र, त्यात जनतेची भागीदारी नव्हती. जर त्याच पद्धतींचा अवलंब केला गेला असता, तर गंगा स्वच्छ झाली नसती, असे मोदी म्हणाले. याच बरोबर, कृषी विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या विरोधकांच्या विरोधावरही त्यांनी हल्ला चढवला. 

शेतकऱ्यांचा अपमाण करतायत विरोधक -मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे. याच वेळी, देशात MSP कायम राहणार आहे आणि विरोधक MSP वरून जो दावा करत आहेत, तो खोटा आहे, असा पुनरुच्चारही मोदींनी केला. 

"आज केंद्र सरकार, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देत आहे. तरीही हे लोक विरोध करत आहेत. शेतकऱ्याला खुल्या बाजारात आपले पिक विकता येऊ नये, अशी या लोकांची इच्छा आहे. ज्या साहित्याची आणि उपकरणांची शेतकरी पूजा करतो, त्यांना आग लाऊन, हे लोक शेतकऱ्यांचा आपमाण करत आहेत," असे मोदी म्हणाले.

नमामी गंगेअंतर्गत 30 हजार कोटींहून अधिकच्या योजनांचे काम सुरू -पंतप्रधान म्हणाले, आता गंगेत घाणेरडे पाणी जाण्यापासून अडवले आहे. हे प्लँट भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. तसेच गंगा नदी काठी असलेल्या शंभरवर शहरांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केले आहे. गंगा नदी बरोबरच तिला जोडल्या जाणाऱ्या इतर नद्याही स्वच्छ करण्यात येत आहेत. एवढेच नाही, तर नमामी गंगे अंतर्गत 30 हजार कोटींहून अधिकच्या योजनांचे काम सुरू आहे.

ट्रॅक्टरला आग लावून व्यक्त केला होता निशेध -केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना घडली. कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून ट्रॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी इंडिया गेटजवळ ही घटना घडली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्र