शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

शेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 29, 2020 13:37 IST

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 'नमामी गंगे मिशन'अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही - मोदीजल जीवन मिशनच्या माध्यमातून घरा-घरात शुद्ध पाणी पोहोचवले जाईल - मोदी

 नवी दिल्ली - गंगा स्वच्छता अभियान हा मुद्दा मोदी सरकारच्या कार्यक्रमातील महत्वांच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 'नमामी गंगे मिशन'अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी, जल जीवन मिशनच्या माध्यमातून घरा-घरात शुद्ध पाणी पोहोचवले जाईल. गंगा म्हणजे आपला वारसा आहे. ती देशातील अनेकांना समृद्ध बनवते. यापूर्वीही गंगा स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. मात्र, त्यात जनतेची भागीदारी नव्हती. जर त्याच पद्धतींचा अवलंब केला गेला असता, तर गंगा स्वच्छ झाली नसती, असे मोदी म्हणाले. याच बरोबर, कृषी विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या विरोधकांच्या विरोधावरही त्यांनी हल्ला चढवला. 

शेतकऱ्यांचा अपमाण करतायत विरोधक -मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे. याच वेळी, देशात MSP कायम राहणार आहे आणि विरोधक MSP वरून जो दावा करत आहेत, तो खोटा आहे, असा पुनरुच्चारही मोदींनी केला. 

"आज केंद्र सरकार, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देत आहे. तरीही हे लोक विरोध करत आहेत. शेतकऱ्याला खुल्या बाजारात आपले पिक विकता येऊ नये, अशी या लोकांची इच्छा आहे. ज्या साहित्याची आणि उपकरणांची शेतकरी पूजा करतो, त्यांना आग लाऊन, हे लोक शेतकऱ्यांचा आपमाण करत आहेत," असे मोदी म्हणाले.

नमामी गंगेअंतर्गत 30 हजार कोटींहून अधिकच्या योजनांचे काम सुरू -पंतप्रधान म्हणाले, आता गंगेत घाणेरडे पाणी जाण्यापासून अडवले आहे. हे प्लँट भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. तसेच गंगा नदी काठी असलेल्या शंभरवर शहरांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केले आहे. गंगा नदी बरोबरच तिला जोडल्या जाणाऱ्या इतर नद्याही स्वच्छ करण्यात येत आहेत. एवढेच नाही, तर नमामी गंगे अंतर्गत 30 हजार कोटींहून अधिकच्या योजनांचे काम सुरू आहे.

ट्रॅक्टरला आग लावून व्यक्त केला होता निशेध -केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना घडली. कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून ट्रॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी इंडिया गेटजवळ ही घटना घडली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्र