शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"घराणेशाही पक्ष फक्त कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, पण भाजप...", नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 18:07 IST

रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

हैदराबाद : घराणेशाही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, परंतु भाजपला देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची काळजी आहे. आमचे संपूर्ण लक्ष लोकांना चांगले जीवन आणि संधी देण्यावर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासियांना 'स्वच्छता कार्यक्रमात' सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, ते म्हणाले की, येथे येण्यापूर्वी आज सकाळी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मी देशवासियांना आवाहन करतो की, स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी एक तास काढा.

याचबरोबर, अलिकडच्या वर्षांत तेलंगणातील जनतेने लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुकांमध्ये भाजपला बळ दिले आहे. आज येथे दिसणाऱ्या गर्दीतून मला विश्वास आहे की तेलंगणातील जनतेने परिवर्तनाचा संकल्प पक्का केला आहे. तेलंगणाला बदल हवा आहे, कारण राज्याला भ्रष्टाचाराची नव्हे तर पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची गरज आहे. तसेच, तेलंगणाला जमिनीवर काम करण्याची आणि भाजप सरकारची गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"शेतकऱ्यांना दिलं होतं खोटे आश्वासन"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. खोट्या आश्वासनांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. आमचे येथे सरकार नाही, तरीही आम्ही शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे बंद असलेला रामागुंडम खत प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केला. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच, 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत तेलंगणातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 10,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणा