शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

"घराणेशाही पक्ष फक्त कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, पण भाजप...", नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 18:07 IST

रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

हैदराबाद : घराणेशाही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, परंतु भाजपला देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची काळजी आहे. आमचे संपूर्ण लक्ष लोकांना चांगले जीवन आणि संधी देण्यावर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासियांना 'स्वच्छता कार्यक्रमात' सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, ते म्हणाले की, येथे येण्यापूर्वी आज सकाळी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मी देशवासियांना आवाहन करतो की, स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी एक तास काढा.

याचबरोबर, अलिकडच्या वर्षांत तेलंगणातील जनतेने लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुकांमध्ये भाजपला बळ दिले आहे. आज येथे दिसणाऱ्या गर्दीतून मला विश्वास आहे की तेलंगणातील जनतेने परिवर्तनाचा संकल्प पक्का केला आहे. तेलंगणाला बदल हवा आहे, कारण राज्याला भ्रष्टाचाराची नव्हे तर पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची गरज आहे. तसेच, तेलंगणाला जमिनीवर काम करण्याची आणि भाजप सरकारची गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"शेतकऱ्यांना दिलं होतं खोटे आश्वासन"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. खोट्या आश्वासनांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. आमचे येथे सरकार नाही, तरीही आम्ही शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे बंद असलेला रामागुंडम खत प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केला. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच, 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत तेलंगणातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 10,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणा