शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

पंतप्रधान मोदींचा १० वर्षांचा कार्यकाळ ईशान्य भारतासाठी ‘सुवर्णकाळ’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 08:21 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे.

शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ हा ईशान्य भारतातील राज्यांसाठी सुवर्णकाळ आहे. या कालावधीत या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी व संघर्ष मिटविण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

नॉर्थ इस्टर्न कौन्सिलच्या (एनइसी) ७१व्या अधिवेशनात ते म्हणाले की, वारंवार होणारे रास्ता रोको, बंद, धुमसत असणारा असंतोष हे राज्यांतील चित्र आता इतिहासजमा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे केवळ ईशान्य भारत व दिल्ली तसेच देशातील अन्य भागांतले अंतर केवळ कमी झाले नाही तर लोकांमधील मतभेदही कमी झाले. 

ईशान्य भारतात हिंसाचाराच्या घटना घटल्याकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत ११,१२१ हिंसक घटना ईशान्य भारतात घडल्या. २०१४ ते २०२३मध्ये या घटनांची संख्या ३,११४ होती. म्हणजे हिंसक घटनांत ७३ टक्क्यांनी घट झाली. या राज्यांत विविध घटनांत लष्करी जवान शहीद होण्याचे प्रमाणही ७१ टक्क्यांनी तर हिंसाचारात नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटले.

घुसखोरीचे प्रमाणही झाले कमीअमित शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये घुसखोरी होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनांचे ८,९०० सदस्य शरण आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले. शांतता व समृद्धी एकत्र नांदते हा संदेश त्यातून सर्व देशाला मिळाला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह