शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंतप्रधान मोदींचा १० वर्षांचा कार्यकाळ ईशान्य भारतासाठी ‘सुवर्णकाळ’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 08:21 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे.

शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ हा ईशान्य भारतातील राज्यांसाठी सुवर्णकाळ आहे. या कालावधीत या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी व संघर्ष मिटविण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

नॉर्थ इस्टर्न कौन्सिलच्या (एनइसी) ७१व्या अधिवेशनात ते म्हणाले की, वारंवार होणारे रास्ता रोको, बंद, धुमसत असणारा असंतोष हे राज्यांतील चित्र आता इतिहासजमा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे केवळ ईशान्य भारत व दिल्ली तसेच देशातील अन्य भागांतले अंतर केवळ कमी झाले नाही तर लोकांमधील मतभेदही कमी झाले. 

ईशान्य भारतात हिंसाचाराच्या घटना घटल्याकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत ११,१२१ हिंसक घटना ईशान्य भारतात घडल्या. २०१४ ते २०२३मध्ये या घटनांची संख्या ३,११४ होती. म्हणजे हिंसक घटनांत ७३ टक्क्यांनी घट झाली. या राज्यांत विविध घटनांत लष्करी जवान शहीद होण्याचे प्रमाणही ७१ टक्क्यांनी तर हिंसाचारात नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटले.

घुसखोरीचे प्रमाणही झाले कमीअमित शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये घुसखोरी होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनांचे ८,९०० सदस्य शरण आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले. शांतता व समृद्धी एकत्र नांदते हा संदेश त्यातून सर्व देशाला मिळाला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह