शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'PM मोदींनी गेल्या 7 वर्षात राजकीय लाभासाठी कधीही 'मन की बात' केली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 11:34 IST

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मांडणार आहे.

ठळक मुद्दे'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात कधीही मन की बात या कार्यक्रमाचा वापर आपल्या राजकीय लाभासाठी केला नाही,' असे जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षांपासून मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. या माध्यमातून देशभरातील खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचण्याचा, तेथील नागरिकांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी अनेकदा केला आहे. मोदींच्या या कार्यक्रमासंदर्भात बोलताना, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. तसेच, मोदींचा मन की बात कार्यक्रम राजकारण विरहीत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मांडणार आहे. कृषी कायदे, पेगॅसस, इंधन दरवाढ, चीनसोबतचा तणाव अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला धारेवर धरणार असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिवेशनासंदर्भात भाष्य केलं. हिवाळी अधिवेशनात सर्वात जास्त चर्चा झाली, असं कौतुक व्हावं, असे मोदी म्हणाले. तसेच, हे अधिवेशन किती वेळा तहकूब करण्यात आलं, अनेकदा गोंधळ झाला, यासाठी या अधिवेशनाची चर्चा होऊ नये, असे म्हणत मोदींनी विरोधकांना टोलाही लगावला. दरम्यान, अधिवेशनपूर्वी बोलताना भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदींचं कौतुक केलंय.  

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात कधीही मन की बात या कार्यक्रमाचा वापर आपल्या राजकीय लाभासाठी केला नाही,' असे जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. 

मला सत्तेत नाही, सेवेत राहायचं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी रविवारी 'मन की बात'(Mann Ki Baat) कार्यक्रमात देशाला संबोधित केले. मन की बातचा हा 83वा भाग होता. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि मोबाईल अॅपवर प्रसारित करण्यात आला. यावेळी पीएम मोदींनी आयुष्मान योजनेपासून स्टार्टअप आणि पर्यावरणापर्यंत चर्चा केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच, मला सत्तेत नाही तर सेवेत रहायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMan ki Baatमन की बात