शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पंतप्रधान मोदी मला सहकार्य करणार - केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:34 IST

त्यामुळं पुढील पाच वर्षात केंद्राच्या मदतीनं दिल्लीचा विकास झपाट्यानं होणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

विकास झाडे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी मंगळवारी दीर्घ चर्चा झाली. दिल्ली विकासासाठी असलेल्या संकल्पना त्यांना अवगत केल्यात. त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकूण घेतलं. पाच मिनिटांची सदिच्छा भेट होती, ती ४० मिनिटं चालली. त्यांनीही मला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. एवढंच नव्हे तर पुढं कोणतीही अडचण आली, तर मला थेट भेटण्याचा सल्ला दिला. त्यामुळं पुढील पाच वर्षात केंद्राच्या मदतीनं दिल्लीचा विकास झपाट्यानं होणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी केजरीवाल यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दिल्ली आणि देशातील राजकारणावर केजरीवाल यांनी दर्डा यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. विजय दर्डा यांच्या या सदिच्छांचा स्वीकार करीत केजरीवाल म्हणाले, मागच्या माझ्या कार्यकाळात मला शेवटच्या एक वर्षातच काम करता आलं. आधीची चार वर्षे हक्काची लढाई लढण्यात गेले. आता आम्ही बदललो आहोत. विकास हाच एकमेव संकल्प आहे. वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक, महिलांना मोफत प्रवास, सर्वोत्तम शाळा आदी कामं ही आमची बलस्थान ठरलीत. त्यामुळंच दिल्लीकरांनी विश्वास ठेवत २०१५ चं प्रेम पुन्हा दिलं. मला समाधान याचं आहे की, अन्य राज्यातही मी राबविलेल्या योजना लागू व्हाव्यात म्हणून आग्रह धरला जातो. पंजाब, हरयाणा, महाराष्टÑ आदी राज्य सरकारांनी दिल्लीच्या अनेक योजनांचं अनुकरण केलं आहे. देशभर अशीच जनहिताची कामं व्हावीत.केजरीवाल म्हणाले, तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच मी निश्चय केला होता की, मला पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारसोबत मिळून काम करायचं आहे. मला तक्रारी करायच्यानाहीत, तर लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी आदींची सदिच्छा भेट घेतली. या सगळ्यांनीच सोबत काम करण्याच्या माझ्या संकल्पाचे स्वागत केले आहे.>गडकरींसारखे नेते हवेतदेशाचा विकास करायचा असेल, तर नितीन गडकरी यांच्यासारखे ‘विकासपुरुष’ हवेत. त्यांच्या कामात राजकारण नसतं, हे मी जाणलं. त्यांनी मला सातत्यानं सहकार्य केलं. माझ्या कामामुळं तेही प्रभावित झाले आहेत. त्यामुळंच आमची चांगली मैत्री झाली आहे. असंच सहकार्य मोदी-शहा दिल्लीच्या विकासाबाबत करतील, अशी भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली....तर देशभर जाणारदेशातील जनतेनं मला खूप प्रेम दिलं आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळतो. नि:स्वार्थ भावनेनं संघर्षातून आम्ही विजय मिळविला आहे. उत्तम भारत घडविण्यासाठी आम्ही ‘राष्टÑनिर्माण’चा संकल्प केला आहे. देशभरातील कोट्यवधी लोक या अभियानात सहभागी होतील. त्यातूनच आम आदमीपार्टीचं संघटन मजबूत होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल