शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

"ही आमची तिसरीच टर्म आहे"; लोकसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:11 IST

संसदेत भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केला आहे.

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणारील प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाषणाच्या शेवटी ही आमची तिसरीच टर्म असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आगामी काळातही हे काम सुरूच राहणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना इशाराच दिला. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी २० ते २५ वर्षांचा कालावधी पुरेसा असतो असं म्हणत ही आमची तिसरीच टर्म आहे असं म्हटलं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केल्याचे म्हटलं जात आहे.

"विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज देश मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हे फक्त सरकारचे स्वप्न नसून प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. जगातील अनेक देशांनी २०-२५ वर्षांत हे केले आहे. भारतात लोकसंख्या, लोकशाही आहे, मग आपण विकास का करू शकत नाही? आपण २०४७ पर्यंत हे करत राहू. आम्हाला अजून मोठी उद्दिष्टे साध्य करायची आहेत आणि आम्ही ते करू. ही आमची फक्त तिसरी टर्म आहे. देशाच्या गरजेनुसार भारत विकसित करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे काम करणार आहोत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशाच्या विकासासाठी सर्व पक्ष, सर्व नेते आणि सर्व देशवासीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले. "सर्व पक्ष आणि नेत्यांची स्वतःची विचारसरणी असेल पण देशापेक्षा मोठे काहीही नाही. जेव्हा या देशाचा विकास होईल तेव्हा आपल्या भावी पिढ्या म्हणतील की २०२५ मध्ये संसद अशी बसली होती की तिथे बसलेला प्रत्येक खासदार विकसित भारतासाठी काम करत होता," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसद