शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

"ही आमची तिसरीच टर्म आहे"; लोकसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:11 IST

संसदेत भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केला आहे.

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणारील प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाषणाच्या शेवटी ही आमची तिसरीच टर्म असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आगामी काळातही हे काम सुरूच राहणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना इशाराच दिला. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी २० ते २५ वर्षांचा कालावधी पुरेसा असतो असं म्हणत ही आमची तिसरीच टर्म आहे असं म्हटलं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केल्याचे म्हटलं जात आहे.

"विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज देश मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हे फक्त सरकारचे स्वप्न नसून प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. जगातील अनेक देशांनी २०-२५ वर्षांत हे केले आहे. भारतात लोकसंख्या, लोकशाही आहे, मग आपण विकास का करू शकत नाही? आपण २०४७ पर्यंत हे करत राहू. आम्हाला अजून मोठी उद्दिष्टे साध्य करायची आहेत आणि आम्ही ते करू. ही आमची फक्त तिसरी टर्म आहे. देशाच्या गरजेनुसार भारत विकसित करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे काम करणार आहोत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशाच्या विकासासाठी सर्व पक्ष, सर्व नेते आणि सर्व देशवासीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले. "सर्व पक्ष आणि नेत्यांची स्वतःची विचारसरणी असेल पण देशापेक्षा मोठे काहीही नाही. जेव्हा या देशाचा विकास होईल तेव्हा आपल्या भावी पिढ्या म्हणतील की २०२५ मध्ये संसद अशी बसली होती की तिथे बसलेला प्रत्येक खासदार विकसित भारतासाठी काम करत होता," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसद