शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"ही आमची तिसरीच टर्म आहे"; लोकसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:11 IST

संसदेत भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केला आहे.

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणारील प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाषणाच्या शेवटी ही आमची तिसरीच टर्म असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आगामी काळातही हे काम सुरूच राहणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना इशाराच दिला. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी २० ते २५ वर्षांचा कालावधी पुरेसा असतो असं म्हणत ही आमची तिसरीच टर्म आहे असं म्हटलं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी भविष्यातील विजयाचा मोठा दावा केल्याचे म्हटलं जात आहे.

"विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज देश मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हे फक्त सरकारचे स्वप्न नसून प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. जगातील अनेक देशांनी २०-२५ वर्षांत हे केले आहे. भारतात लोकसंख्या, लोकशाही आहे, मग आपण विकास का करू शकत नाही? आपण २०४७ पर्यंत हे करत राहू. आम्हाला अजून मोठी उद्दिष्टे साध्य करायची आहेत आणि आम्ही ते करू. ही आमची फक्त तिसरी टर्म आहे. देशाच्या गरजेनुसार भारत विकसित करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे काम करणार आहोत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशाच्या विकासासाठी सर्व पक्ष, सर्व नेते आणि सर्व देशवासीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले. "सर्व पक्ष आणि नेत्यांची स्वतःची विचारसरणी असेल पण देशापेक्षा मोठे काहीही नाही. जेव्हा या देशाचा विकास होईल तेव्हा आपल्या भावी पिढ्या म्हणतील की २०२५ मध्ये संसद अशी बसली होती की तिथे बसलेला प्रत्येक खासदार विकसित भारतासाठी काम करत होता," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसद