शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

PM Modi Speech: जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:12 IST

PM Modi Address: राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले.

PM Modi Address: राजस्थानमधील जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले. मोदींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासमोरील आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे.

मोदी स्वत: जयपूरला गेले नसले तरी त्यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला भाजपचे सर्व बडे नेते पोहोचले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज आपण पाहत आहोत की, काही पक्षांची इकोसिस्टम संपूर्ण ताकदीनिशी देशाच्या मुख्य समस्यांवरुन दुसरीकडे वळवण्यात गुंतलेली आहे. अशा पक्षांच्या फंदात आपण कधीही पडू नये. आपण कधीही शॉर्टकट घेऊ नये. देशाच्या हिताशी निगडीत जे काही मूलभूत मुद्दे आहेत, जे मूळ मुद्दे आहेत त्यावर आपल्याला पुढे जायचे आहे.

जगाला भारताकडून खूप अपेक्षा- पंतप्रधान मोदीयादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा आपण भाजपचे स्वरुप पाहतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. मी पक्षाच्या त्या सर्व लोकांना नमन करतो ज्यांनी स्वत: ला या पक्षाच्या उभारणीत खर्च केले. 21व्या शतकाचा काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जग आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्याचप्रमाणे भारतात भाजपप्रती जनतेची विशेष आपुलकी दिसून येते. देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. देशासमोर जी आव्हाने आहेत, त्या प्रत्येक आव्हानावर देशातील जनतेच्या सोबतीने मात करायची आहे.

भाजपने लोकांची विचारसरणी बदलली - पंतप्रधानआपल्या देशात एकेकाळी चालढकलपणा केला जायचा. ना त्यांना सरकारकडून अपेक्षा होती, ना सरकारने त्यांच्या प्रति उत्तरदायित्वाचा विचार केला होता. पण, 2014 नंतर भाजपने या विचारसरणीतून देशाला बाहेर काढले. देशाच्या उज्ज्वल भवितव्याची मी पूर्ण आतुरतेने वाट पाहत आहे. मी देशातील तरुणांना आत्मविश्वासाने भरलेले पाहतो, बहिणी-मुलींना काहीतरी करण्याची हिंमत दाखवून पुढे जाताना पाहतो, तेव्हा माझा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढतो.

'मला पुढील 25 वर्षांचे ध्येय ठरवायचे आहे'मोदी पुढे म्हणाले की, देशातील लोकांची ही आशा आणि आकांक्षा आपली जबाबदारी खूप वाढवते. स्वातंत्र्याच्या या अमृत कार्यात देश स्वत:साठी पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे ठरवत आहे. भाजपसाठी हीच वेळ आहे, पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे निश्चित करण्याची, त्यांच्यासाठी सतत काम करण्याची. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे अखंड मानवतावाद आणि अंत्योदय हे आपले तत्त्वज्ञान आहे. आपले विचार हे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे सांस्कृतिक राष्ट्रीय धोरण आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हा आमचा मंत्र आहे, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाJaipur Pink Panthersतमीळ थलायवाजNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा