शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

PM Modi Speech: जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:12 IST

PM Modi Address: राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले.

PM Modi Address: राजस्थानमधील जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले. मोदींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासमोरील आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे.

मोदी स्वत: जयपूरला गेले नसले तरी त्यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला भाजपचे सर्व बडे नेते पोहोचले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज आपण पाहत आहोत की, काही पक्षांची इकोसिस्टम संपूर्ण ताकदीनिशी देशाच्या मुख्य समस्यांवरुन दुसरीकडे वळवण्यात गुंतलेली आहे. अशा पक्षांच्या फंदात आपण कधीही पडू नये. आपण कधीही शॉर्टकट घेऊ नये. देशाच्या हिताशी निगडीत जे काही मूलभूत मुद्दे आहेत, जे मूळ मुद्दे आहेत त्यावर आपल्याला पुढे जायचे आहे.

जगाला भारताकडून खूप अपेक्षा- पंतप्रधान मोदीयादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा आपण भाजपचे स्वरुप पाहतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. मी पक्षाच्या त्या सर्व लोकांना नमन करतो ज्यांनी स्वत: ला या पक्षाच्या उभारणीत खर्च केले. 21व्या शतकाचा काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जग आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्याचप्रमाणे भारतात भाजपप्रती जनतेची विशेष आपुलकी दिसून येते. देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. देशासमोर जी आव्हाने आहेत, त्या प्रत्येक आव्हानावर देशातील जनतेच्या सोबतीने मात करायची आहे.

भाजपने लोकांची विचारसरणी बदलली - पंतप्रधानआपल्या देशात एकेकाळी चालढकलपणा केला जायचा. ना त्यांना सरकारकडून अपेक्षा होती, ना सरकारने त्यांच्या प्रति उत्तरदायित्वाचा विचार केला होता. पण, 2014 नंतर भाजपने या विचारसरणीतून देशाला बाहेर काढले. देशाच्या उज्ज्वल भवितव्याची मी पूर्ण आतुरतेने वाट पाहत आहे. मी देशातील तरुणांना आत्मविश्वासाने भरलेले पाहतो, बहिणी-मुलींना काहीतरी करण्याची हिंमत दाखवून पुढे जाताना पाहतो, तेव्हा माझा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढतो.

'मला पुढील 25 वर्षांचे ध्येय ठरवायचे आहे'मोदी पुढे म्हणाले की, देशातील लोकांची ही आशा आणि आकांक्षा आपली जबाबदारी खूप वाढवते. स्वातंत्र्याच्या या अमृत कार्यात देश स्वत:साठी पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे ठरवत आहे. भाजपसाठी हीच वेळ आहे, पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे निश्चित करण्याची, त्यांच्यासाठी सतत काम करण्याची. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे अखंड मानवतावाद आणि अंत्योदय हे आपले तत्त्वज्ञान आहे. आपले विचार हे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे सांस्कृतिक राष्ट्रीय धोरण आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हा आमचा मंत्र आहे, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाJaipur Pink Panthersतमीळ थलायवाजNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा