शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राहुल गांधींनी कागद न घेता 15 मिनिटं बोलून दाखवावं, मोदींचं राहुलना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 16:25 IST

मोदींचा राहुल गांधी आणि काँग्रेस सरकारवर हल्लाबोल

म्हैसूर: कर्नाटकमध्ये भाजपची लाट नाही, तर वादळ आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. कर्नाटक काँग्रेस सरकार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना यावेळी मोदींनी लक्ष्य केलं. राहुल गांधी कर्नाटक सरकारच्या कामगिरीबद्दल 15 मिनिटं बोलले, तरी खूप झालं, असं म्हणत मोदींनी त्यांना काँग्रेस सरकारच्या कामाबद्दल 15 मिनिटं बोलण्याचं आव्हान दिलं. 'तुम्ही नामदार आहात. आम्ही कामदार आहोत,' असा टोलादेखील मोदींनी राहुल यांना लगावला. ते म्हैसूरमध्ये बोलत होते. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच मोदींना थेट आव्हान दिलं होतं. मोदी त्यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकसभेत 15 मिनिटंदेखील बोलू शकणार नाहीत, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल यांच्या या आव्हानाला मोदींनी प्रतिआव्हान दिलंय. राहुल गांधीनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल 15 मिनिटं बोलून दाखवावं असं आव्हान मोदींनी दिलं. 'तुमच्या सरकारनं केलेल्या कामांबद्दल बोलून दाखवा. कोणताही कागद न पाहता राहुल यांनी हिंदी, इंग्रजी किंवा त्यांच्या मातृभाषेत बोलावं,' असं मोदी म्हणाले. भाजप सरकारच्या काळात देशाच्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. '2005 मध्ये मनमोहन सिंग यांनी 2009 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचेल, असं म्हटलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं? काँग्रेसनं डॉ. मनमोहन सिंग यांना कशी वागणूक दिली, हे आपण पाहिलंय. मनमोहन सिंग यांनी आणलेला अध्यादेश राहुल गांधींनी फाडला होता,' याची आठवणही मोदींनी यावेळी करून दिली. जिथे लोकायुक्तच सुरक्षित नसतील, तिथे सामान्य लोक किती सुरक्षित असतील?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही भाष्य केलं.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदी