शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 09:05 IST

पंतप्रधान; नवे मंत्री परिचयाविना राहिल्याने मोदी गेले निघून

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात गदरोळाने झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या मंत्र्यांची ओळख करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. मात्र, विरोधकांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर घोषणबाजी करून गोंधळ घातला. त्यामुळे ४३ नव्या मंत्र्यांचा परिचय मात्र होऊ शकला नाही. या एकूण प्रकारावरून मोदींनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आणि ते सभागृहातून निघून गेले. महिला तसेच मागासवर्गीय, आदिवासी समाजातील सदस्यांना मंत्रिपद मिळत असल्याचे विरोधकांच्या पचनी पडत नसल्याची टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर प्रथेनुसार पंतप्रधान मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इंधनाच्या वाढलेल्या किमती तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अनेक सदस्य फलके घेऊन लोकसभाध्यक्षांच्या आसनापुढे आले. 

देशामध्ये ४० कोटींहून अधिक `बाहुबली’

देशामध्ये ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, असे ४० कोटींपेक्षा अधिक `बाहुबली’ कोरोनाविरोधी लढ्यासाठी सज्ज झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. सभागृहाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, कोरोना लस बाहूमध्ये (दंडामध्ये) टोचून घेतली जाते. देशात ४० कोटींपेक्षा अधिक लोकांनी ही लस टोचून घेतली आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकार