शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

PM Narendra Modi Interview: “योगींनी यूपीतील सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले, कधीही तडजोड केली नाही”: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:04 IST

PM Narendra Modi Interview: यूपीमध्ये एक काळ होता जेव्हा गुन्हेगार त्यांना हवे ते करु शकत होते. आता तेच आत्मसमर्पण करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची पाठ थोपटत कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सुरक्षिततेशी कधी तडजोड केली नाही, त्यांनी नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. जेव्हा जनता यूपीच्या सुरक्षेबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते मागील सरकारमधील माफियाराज, गुंडाराज होते. सरकारमध्ये बाहुबलींना आश्रय मिळत होता, याबाबतच चर्चा ऐकू येत होत्या. उत्तर प्रदेशमधील जनतेने या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. एका ठराविक वेळेनंतर महिला घराबाहेर पडू शकत नव्हत्या, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

योगींनी यूपीतील सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले

भाजपचे योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर गुंडाराज, माफियाराज संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सुरक्षितेला प्राधान्य दिले. अनेक नव्या गोष्टी राबवल्या. सुरक्षिततेशी कधीही तडजोड केली नाही. अंधार पडल्यानंतरही बाहेर पडू शकते, असे आज महिलांचे म्हणणे आहे. हा विश्वास सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यूपीमध्ये एक काळ होता जेव्हा गुंड त्यांना हवे ते करू शकत होते. मात्र, आज तेच आत्मसमर्पण करतात, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. 

देशातील निवडणुकांच्या पाचही राज्यात भाजपचीच लाट

आताच्या घडीला देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यास या प्रत्येक ठिकाणी भाजपची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळेल. या पाच राज्यातील जनता भाजपला सेवेची संधी देईल. ज्या राज्यातील जनतेची सेवा करण्याची आम्हाला मिळाली, तेथे जनतेने आमचे काम पाहिले आहे. त्यामुळे तेथेही पुन्हा एकदा आमची सत्ता स्थापन होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणुका होणार असून, १० मार्च रोजी एकत्रितपणे मतमोजणी आहे. १० फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्याच्या मतदानापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२