शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi Interview: “छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द केले”: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:50 IST

PM Narendra Modi Interview: देशातील शेतकरी भाजपचा जयजयकार करतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात (Farmers Protest) सुमारे वर्षभर देशातील लाखो शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. अनेक चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या. अखेर केंद्रातील मोदी सरकारने नमते घेऊन कृषी कायदे रद्द (Farm Laws Repealed) केले. या पार्श्वभूमीवर बोलताना देशातील छोट्या शेतकऱ्यांच्याही वेदना समजू शकतो. राष्ट्रहितासाठी केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द केले, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिले आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. शेतकऱ्यांनी दिलेल्या मोठ्या लढ्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अखेर वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द केले. तसा ठरावही संसदेत मंजूर केला. मात्र, मोदी सरकारने निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने कृषी कायदे रद्द केले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय निर्णय होता, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द घेतले

शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी आलो आहे आणि तसेच करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना मला कळतात. मी म्हणालो होतो की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीविषयक कायदे लागू केले गेले, पण राष्ट्रहितासाठी ते मागे घेण्यात आले, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. यापुढे पुन्हा एकदा शेतकरी बांधावांशी या कायद्यासंदर्भात चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आला. यावर, शेतकरी बांधवांशी नेहमी आमचा संवाद सुरू असतो. अगदी अर्थसंकल्प तयार करतानाही आम्ही त्यांचे विचार घेतो. आपल्या देशातील छोट्यातील छोटा व्यक्तीही आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. त्यांचे अनेक अनुभव आम्हाला उपयोगी पडतात. प्रशासनातील बाबू मंडळी आणि नेत्यांनाच सगळ्यातील सगळे कळते, असे नाही, असे मोदी म्हणाले.

देशातील शेतकरी भाजपचा जयजयकार करतो

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घोषित करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी फारशी झालेली दिसली नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना आणल्या. इतकेच नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट योजनेचे पैसे पोहोचतात. यापूर्वी असे घडत नव्हते, असे शेतकरीच सांगतात आणि भाजपचा जयजयकार करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी