शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसने शेतकऱ्यांबद्दल बाता मारल्या, केले काहीही नाही; पाणी तंटे विकोपाला नेले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:08 IST

राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त आयोजिलेत समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले.

जयपूर : काँग्रेस शेतकऱ्यांबद्दल मोठमोठ्या बाता मारते, पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी या पक्षाने काहीही केलेले नाही आणि तसेच ते दुसऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ देत नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. ते म्हणाले की, काँग्रेसने राज्या-राज्यांमधील जलविवाद सोडविण्याऐवजी ते अधिक विकोपाला नेले. 

राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त आयोजिलेत समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले. त्या राज्यातील ऊर्जा, रस्ते, रेल्वे, जलसंपदा क्षेत्रातील २४ विकासप्रकल्पांपैकी काहींचा पायाभरणी, तर काही प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ मोदी यांच्या हस्ते पार पडला. ४६,३०० कोटी रुपये खर्चाचे हे सारे प्रकल्प आहेत. 

मोदी यावेळी म्हणाले की, काँग्रेसने राज्या-राज्यांमधील जलविवाद सोडविण्याऐवजी अधिक जटिल बनवले. मात्र, भाजपने राज्यांमध्ये सुसंवाद वाढावा. आमचा संघर्षापेक्षा सहकार्यावर विश्वास आहे. भाजपने विरोधासाठी विरोध कधीच केला नाही. आम्हाला अनेक प्रश्नांवर तोडगे काढायचे आहेत. प्रश्न न सोडविता त्यांचे भिजत घोंगडे ठेवण्यात भाजपला स्वारस्य नाही. त्यामुळे आम्ही इआरसीपी प्रकल्पाला मंजुरी दिलीच, शिवाय त्या प्रकल्पाचा विस्तारही केला, असे माेदी म्हणाले.  

‘नर्मदा प्रकल्पातही काँग्रेसचा खो घालायचा प्रयत्न’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नर्मदेचे पाणी गुजरातमधील विविध भागांत पोहोचावे यासाठी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी एक मोहीम राबविली होती. त्यावेळी त्या मोहिमेत खो घालण्याचे प्रयत्न काँग्रेस व काही स्वयंसेवी संस्थांनी केले, असाही आरोप पंतप्रधानांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी