शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी 51,000 तरुणांना दिले नियुक्तीपत्रे, म्हणाले- 'रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्यातात सहभागी झाले. यावेळी त्यांनी 51,000 हून अधिक ननवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देशाच्या स्वातंत्र्याचे आणि करोडो लोकांचे रक्षक बनल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज ज्या तरुणांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, ते देशसेवा करण्याबरोबरच देशातील नागरिकांचेही रक्षण करतील. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, देश अभिमानाने आणि आत्मविश्वासाने भरलेला असताना या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. एकीकडे चंद्रयान-3 यशस्वी झाले अन् दुसरीकडे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास सुरू करणार आहात. दशकभरात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. अर्थव्यवस्था समृद्ध होण्यासाठी प्रत्येक क्षेत्राने पुढे जाणे आवश्यक आहे. आज ऑटोमोबाईल आणि ऑटो-कॉम्पोनंट उद्योग 12 लाख कोटींहून अधिक किमतीचा आहे. ही वाढ हाताळण्यासाठी, उद्योगाला तरुणांची आवश्यकता असेल आणि त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असतील.

मोदी पुढे म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेने गावातील आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात तसेच रोजगार निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली. या योजनेअंतर्गत गेल्या 9 वर्षांत 50 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. जन धन खात्यांमुळे खेड्यातील महिला बचत गटांना बळकट करण्यासाठीही खूप मदत झाली आहे. अनेक महिला लखपती दीदी झाल्या आहेत. या योजनेने देशातील सामाजिक आणि आर्थिक बदलांना गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्याने उत्पन्न वाढेल आणि सर्वांचे जीवनमान चांगले राहील.

गेल्या 9 वर्षांत आमच्या प्रयत्नांमुळे बदलाचा एक नवीन टप्पा दिसू लागला आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली. जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे हे द्योतक आहे. 'व्होकल फॉर लोकल' या मंत्राला अनुसरून भारत सरकारही 'मेड इन इंडिया' लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर भर देत आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगमध्येही वाढ झाली असून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत, असंही पीएम मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीjobनोकरीGovernmentसरकार