शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

PM मोदींनी 51,000 तरुणांना दिले नियुक्तीपत्रे, म्हणाले- 'रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्यातात सहभागी झाले. यावेळी त्यांनी 51,000 हून अधिक ननवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देशाच्या स्वातंत्र्याचे आणि करोडो लोकांचे रक्षक बनल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज ज्या तरुणांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, ते देशसेवा करण्याबरोबरच देशातील नागरिकांचेही रक्षण करतील. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, देश अभिमानाने आणि आत्मविश्वासाने भरलेला असताना या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. एकीकडे चंद्रयान-3 यशस्वी झाले अन् दुसरीकडे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास सुरू करणार आहात. दशकभरात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. अर्थव्यवस्था समृद्ध होण्यासाठी प्रत्येक क्षेत्राने पुढे जाणे आवश्यक आहे. आज ऑटोमोबाईल आणि ऑटो-कॉम्पोनंट उद्योग 12 लाख कोटींहून अधिक किमतीचा आहे. ही वाढ हाताळण्यासाठी, उद्योगाला तरुणांची आवश्यकता असेल आणि त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असतील.

मोदी पुढे म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेने गावातील आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात तसेच रोजगार निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली. या योजनेअंतर्गत गेल्या 9 वर्षांत 50 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. जन धन खात्यांमुळे खेड्यातील महिला बचत गटांना बळकट करण्यासाठीही खूप मदत झाली आहे. अनेक महिला लखपती दीदी झाल्या आहेत. या योजनेने देशातील सामाजिक आणि आर्थिक बदलांना गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्याने उत्पन्न वाढेल आणि सर्वांचे जीवनमान चांगले राहील.

गेल्या 9 वर्षांत आमच्या प्रयत्नांमुळे बदलाचा एक नवीन टप्पा दिसू लागला आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली. जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे हे द्योतक आहे. 'व्होकल फॉर लोकल' या मंत्राला अनुसरून भारत सरकारही 'मेड इन इंडिया' लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर भर देत आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगमध्येही वाढ झाली असून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत, असंही पीएम मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीjobनोकरीGovernmentसरकार