शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"डझनभर हिंदूंची हत्या, १५२ मंदिरांवर हल्ले"; बांगलादेशातल्या हिंसाचारावर सरकारने काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:08 IST

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Bangladesh Violence: बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांबद्दल जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतरही बांगलादेशातील परिस्थिती सुधारलेली नाही. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या बाबतीत हात वर केले असले तरी गेल्या सहा महिन्यांत बांगलादेश अल्पसंख्याकांसाठी जगणं मुश्किल झालं आहे. हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल भारत सरकारने बांगलादेशला इशारा दिला होता. मात्र आता अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारने दिलेल्या माहितीमुळे बांगलादेश हिंदूसाठी नरक बनला असल्याचे समोर आलंय.

सत्तांतरानंतरही बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड आणि हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. असं असतानाही, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी सरकार या हल्ल्यांचे दावे फेटाळत आहे. मात्र आता केंद्र सरकारने संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बांगलादेशातील हिंदूंबाबत आकडेवारी सादर केली आहे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या हिंदूविरोधी हिंसाचारात  २३ हिंदूंचा मृत्यू झाला असून १५२ हिंदू मंदिरांवर हल्ले आणि तोडफोड करण्यात आल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले.

बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून २३ हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. किमान १५२ हिंदू मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी ही माहिती दिली. "गेल्या दोन महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याच्या ७६ घटनांची नोंद झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून २३ हिंदूंचा मृत्यू झाला आहे आणि हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या १५२ घटनांची नोंद झाली आहे," असं मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी सांगितले.

केंद्र सरकार बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बांगलादेशी सरकारला सतत याबाबत विचारणा केली जात असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. 

बांगलादेशच्या पोलिसांनी केले कबुल

"परराष्ट्र सचिवांनी ९ डिसेंबर रोजी बांगलादेशला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बांगलादेश सरकारकडे हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. यानंतर,१० डिसेंबर २०२४ रोजी बांगलादेश सरकारने स्वतः पत्रकार परिषदेत अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या ८८ प्रकरणांची माहिती दिली आणि ७० लोकांना अटक केल्याचा दावा केला. तसेच, तपासानंतर बांगलादेश पोलिसांनी १२५४ अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती दिली," असेही कीर्ती वर्धन सिंग यांनी म्हटलं. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतParliamentसंसद