शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 22:47 IST

PM Modi reaction on Indus Water treatry: १९६० सालापासून सुरु असलेला करार पहिल्यांदाच रोखला आहे

PM Modi reaction on Indus Water treatry: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन उघड झाले होते. त्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. १९६० मध्ये पाकिस्तानसोबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा ऐतिहासिक पाणीवाटप करार करण्यात आला. पण पहलगाम हल्ल्यानंतर हा करार निलंबित करण्यात आला. पाकिस्तानसोबतचा हा करार रद्द केल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे यावर भाष्य केले. भारतासाठी राखीव ठेवलेले पाणी आता देशातच राहील आणि वापरले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"पूर्वी भारताच्या हक्काचं पाणीही बाहेर जात होतं, पण आता भारताचे पाणी भारताकडेच राहिल आणि भारताच्या लोकांसाठी वापरण्यात येईल. कठोर निर्णय घेण्यासाठी पूर्वी लोक घाबरायचे. एक काळ असा होता जेव्हा लोक कोणतेही आवश्यक पाऊल उचलण्यापूर्वी जग काय विचार करेल याचा विचार करायचे. त्यांना मते मिळतील की नाही, त्यांची जागा सुरक्षित राहील की नाही याचा विचार करायचे. या कारणांमुळे मोठ्या सुधारणांना विलंब होत असे. कोणताही देश अशा प्रकारे प्रगती करू शकत नाही. पण आपण देशाला प्रथम स्थान देतो, तेव्हाच देशाची प्रगती होते," असे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले.

कराराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच रोखलं पाणी

दरम्यान, हा करार थांबवण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने घेतला. राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारची सर्वोच्च निर्णय घेणारी ही संस्था आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील, असे या समितीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणी कराराच्या स्थापनेपासून भारताने अधिकृतपणे पहिल्यांदाच पाणी रोखले आहे. हा भारताच्या राजकीय भूमिकेत एक महत्त्वाचा बदल आहे. गेल्या काही वर्षांपासून सततच्या तणावामुळे या कराराचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात असूनही हा करार आतापर्यंत सुरुच होता. अखेर यावेळी त्याबाबत निर्णय घेतला गेला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान