शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 22:47 IST

PM Modi reaction on Indus Water treatry: १९६० सालापासून सुरु असलेला करार पहिल्यांदाच रोखला आहे

PM Modi reaction on Indus Water treatry: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन उघड झाले होते. त्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. १९६० मध्ये पाकिस्तानसोबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा ऐतिहासिक पाणीवाटप करार करण्यात आला. पण पहलगाम हल्ल्यानंतर हा करार निलंबित करण्यात आला. पाकिस्तानसोबतचा हा करार रद्द केल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे यावर भाष्य केले. भारतासाठी राखीव ठेवलेले पाणी आता देशातच राहील आणि वापरले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"पूर्वी भारताच्या हक्काचं पाणीही बाहेर जात होतं, पण आता भारताचे पाणी भारताकडेच राहिल आणि भारताच्या लोकांसाठी वापरण्यात येईल. कठोर निर्णय घेण्यासाठी पूर्वी लोक घाबरायचे. एक काळ असा होता जेव्हा लोक कोणतेही आवश्यक पाऊल उचलण्यापूर्वी जग काय विचार करेल याचा विचार करायचे. त्यांना मते मिळतील की नाही, त्यांची जागा सुरक्षित राहील की नाही याचा विचार करायचे. या कारणांमुळे मोठ्या सुधारणांना विलंब होत असे. कोणताही देश अशा प्रकारे प्रगती करू शकत नाही. पण आपण देशाला प्रथम स्थान देतो, तेव्हाच देशाची प्रगती होते," असे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले.

कराराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच रोखलं पाणी

दरम्यान, हा करार थांबवण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने घेतला. राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारची सर्वोच्च निर्णय घेणारी ही संस्था आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील, असे या समितीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणी कराराच्या स्थापनेपासून भारताने अधिकृतपणे पहिल्यांदाच पाणी रोखले आहे. हा भारताच्या राजकीय भूमिकेत एक महत्त्वाचा बदल आहे. गेल्या काही वर्षांपासून सततच्या तणावामुळे या कराराचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात असूनही हा करार आतापर्यंत सुरुच होता. अखेर यावेळी त्याबाबत निर्णय घेतला गेला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान