शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 22:47 IST

PM Modi reaction on Indus Water treatry: १९६० सालापासून सुरु असलेला करार पहिल्यांदाच रोखला आहे

PM Modi reaction on Indus Water treatry: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन उघड झाले होते. त्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. १९६० मध्ये पाकिस्तानसोबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा ऐतिहासिक पाणीवाटप करार करण्यात आला. पण पहलगाम हल्ल्यानंतर हा करार निलंबित करण्यात आला. पाकिस्तानसोबतचा हा करार रद्द केल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे यावर भाष्य केले. भारतासाठी राखीव ठेवलेले पाणी आता देशातच राहील आणि वापरले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"पूर्वी भारताच्या हक्काचं पाणीही बाहेर जात होतं, पण आता भारताचे पाणी भारताकडेच राहिल आणि भारताच्या लोकांसाठी वापरण्यात येईल. कठोर निर्णय घेण्यासाठी पूर्वी लोक घाबरायचे. एक काळ असा होता जेव्हा लोक कोणतेही आवश्यक पाऊल उचलण्यापूर्वी जग काय विचार करेल याचा विचार करायचे. त्यांना मते मिळतील की नाही, त्यांची जागा सुरक्षित राहील की नाही याचा विचार करायचे. या कारणांमुळे मोठ्या सुधारणांना विलंब होत असे. कोणताही देश अशा प्रकारे प्रगती करू शकत नाही. पण आपण देशाला प्रथम स्थान देतो, तेव्हाच देशाची प्रगती होते," असे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले.

कराराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच रोखलं पाणी

दरम्यान, हा करार थांबवण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने घेतला. राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारची सर्वोच्च निर्णय घेणारी ही संस्था आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील, असे या समितीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणी कराराच्या स्थापनेपासून भारताने अधिकृतपणे पहिल्यांदाच पाणी रोखले आहे. हा भारताच्या राजकीय भूमिकेत एक महत्त्वाचा बदल आहे. गेल्या काही वर्षांपासून सततच्या तणावामुळे या कराराचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात असूनही हा करार आतापर्यंत सुरुच होता. अखेर यावेळी त्याबाबत निर्णय घेतला गेला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान