शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“भारत शक्य ती सर्व मदत करण्यास तयार”; म्यानमारमधील भूकंपाच्या विध्वंसावर पंतप्रधान मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:37 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपावर चिंता व्यक्त केली.

PM Modi on Myanmar Thailand Earthquake:म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भुकंपामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी सकाळी ११.५० च्या सुमारास म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा प्रभाव भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह पाच देशांमध्येही जाणवला. म्यानमार आणि थायलंडमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्यानमारमधील या तीव्र भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या मदतीसाठी भारत मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराजवळ होता. या भूकंपामुळे इमारती आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली. म्यानमारमध्ये भूकंपामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर २०० लोक जखमी झाले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकामाधीन असलेली ३० मजली इमारत कोसळली. या साइटवर ४०० लोक काम करत होते. यापैकी ८० लोक बेपत्ता आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या भीषण विध्वंसाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

“म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थिती पाहून मी चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करुयात. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याबाबतही चर्चा केली आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भूकंपाच्या विध्वसांमुळे थायलंडमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.मोठ्या इमारती कोसळल्यामुळे थायलंडमध्ये सध्या अनेक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे भूकंपामुळे म्यानमारमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का!

दरम्यान, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात १५-२० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार होता. भारतात आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMyanmarम्यानमारThailandथायलंडEarthquakeभूकंप