शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

“भारत शक्य ती सर्व मदत करण्यास तयार”; म्यानमारमधील भूकंपाच्या विध्वंसावर पंतप्रधान मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:37 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपावर चिंता व्यक्त केली.

PM Modi on Myanmar Thailand Earthquake:म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भुकंपामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी सकाळी ११.५० च्या सुमारास म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा प्रभाव भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह पाच देशांमध्येही जाणवला. म्यानमार आणि थायलंडमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्यानमारमधील या तीव्र भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या मदतीसाठी भारत मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराजवळ होता. या भूकंपामुळे इमारती आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली. म्यानमारमध्ये भूकंपामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर २०० लोक जखमी झाले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकामाधीन असलेली ३० मजली इमारत कोसळली. या साइटवर ४०० लोक काम करत होते. यापैकी ८० लोक बेपत्ता आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या भीषण विध्वंसाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

“म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थिती पाहून मी चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करुयात. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याबाबतही चर्चा केली आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भूकंपाच्या विध्वसांमुळे थायलंडमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.मोठ्या इमारती कोसळल्यामुळे थायलंडमध्ये सध्या अनेक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे भूकंपामुळे म्यानमारमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का!

दरम्यान, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात १५-२० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार होता. भारतात आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMyanmarम्यानमारThailandथायलंडEarthquakeभूकंप