शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शहरी बेरोजगारांना नोकरी अन् युनिव्हर्सल इन्कमचं बेनिफिट; तरुणांसाठी असा आहे मोदी सरकारचा अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 11:30 IST

बेरोजगारी आणि इन्कम तुटीच्या समस्येवर तोडगा कसा काढला जाऊ शकतो यावर मोदी सरकार काम करत आहे.

नवी दिल्ली-

बेरोजगारी आणि वेतन तुटीच्या समस्येवर तोडगा कसा काढला जाऊ शकतो यावर मोदी सरकार काम करत आहे. यात पंतप्रधानांना आर्थिक मुद्द्यांवर सल्ला देणाऱ्या समितीनं काही सल्ले दिले आहेत. शहरी बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी एखादी योजना लाँच करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला इकोनॉमिक अॅडव्हायझरी काऊन्सिलनं पंतप्रधानांना दिला आहे. यासोबतच मिळकतीतील तुट कमी करण्यासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीमवर काम करण्याची गरज आहे. 

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार किमान मिळकतीत वाढ करण्यासोबतच सरकारनं सोशल सेक्टरवर अधिक खर्च करणं गरजेचं आहे. ज्यामुळे अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांमुळे लोकांना गरीबीच्या दरीत ढकललं जाण्यापासून वाचवता येईल. 

The State of Inequality in India नावानं संबंधित रिपोर्ट EAC चे चेअरमन विवेक देबरॉय यांनी बुधावारी सादर केला आहे. रिपोर्ट सादर करताना देबरॉय यांनी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील मजुरांना काम मिळण्याचं आश्वासन देण्यासंबंधी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण शहरात मनरेगा सारख्या समकालीन योजनांमध्ये आवश्यकतेनुसार काम मिळतं आणि यामुळे अडचणी येतात. यासोबतच विवेक देबरॉय यांनी किमान वेतन वाढविण्यासाठी आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम देण्यास सुरुवात करण्याची मागणी केली आहे. 

२०१७ साली समोर आली होती बेसिक इन्कमची कल्पनायुनिर्व्हसल बेसिक इन्कमची संकल्पना याआधी माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी आर्थिक वर्ष २०१७ मध्ये आर्थिक सर्व्हेक्षणात दिली होती. २०१८ साली देखील केंद्र सरकार Universal Basic Income स्कीम आणणार असल्याची चर्चा समोर आली होती. यात शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार युवांचा समावेश करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला २ हजार ते २,५०० रुपये दरमहा दिले जाण्याचं नमूद करण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात ही योजना अद्याप लागू होऊ शकलेली नाही. 

तत्कालीन अर्थमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी या योजनेला पाठिंबा दिला होता. पण राजकीय दृष्ट्या ती अंमलात आणणं शक्यत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. कारण सद्यस्थितीत उपलब्ध असलेली सब्सिडी बंद न करण्याची मागणी खासदार लोकसभेत करू लागतील असं ते स्पष्टपणे म्हणाले होते. 

ऑक्टोबर २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही UBI योजनेला समर्थन दिलं होतं. अन्न आणि तेलावर दिली जाणारी सबसिडी रद्द करुन संबंधित योजना सुरू करता येऊ शकेल असं नाणेनिधीनं म्हटलं होतं. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनीही UBI चा उल्लेख केला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना लागू करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय